मुंबई : भाजप EVM शिवाय ४०० पार होणार नाही म्हणून evm हॅकिंग थांबवण्याचा दृष्टीकोणातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्रित निवडणुक आयोगाकडे जाणार आणि बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी अशी मागणी करणार असे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलतांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका या एव्हीएम मशिनवर होणार का बॅलेट पेपरवर होणार ? याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा..“मुंबई पालिका भ्रष्टाचाराचे आगार, 700 कोटींच्या कंत्राटावर डल्ला”, विरोधकांचा हल्लाबोल
महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही चर्चा केली की, आम्ही सर्व निवडणुक आयोगाकडे सगळ्या पक्षांना घेऊन जाऊ आणि जेवढे तथ्य आहे त्यांच्यासमोर मांडू, असे त्यांना म्हटले आहे. मला १९८५ च्या निवडणुकीचा अनुभव आहे. तेव्हाची निवडणूक ही बॅलेट पेपरवर होती. बॅलेट पेपरवरील मतदान मोजायला १५ दिवस लागतील, असे नव्या पिढीला सांगितले जाते हा चुकीचा प्रचार आहे. त्यावेळेस मतदान संपलं की दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. तेव्हा रात्री १२ च्या आधी निकाल यायचा. असेही आंबेडकरांनी सांगितले.
हेही वाचा…“नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात सांगेन की शरद पवारांनी माझ्यावर..,” सुनील शेळकेंचं पवारांना प्रत्युत्तर
आम्ही प्रत्येक उमेदवाराला सांगणार आहो की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी केली जाईल. छाननीमध्ये आपला अर्ज टिकला तर संबंधित अधिकाऱ्याकडे आपण अर्ज केला पाहिजे की मोजणीच्या दिवशी अर्ज १७ मध्ये किती मतदान झाले याचे अधिकृत आकडे संबंधित अधिकारी देतो. तो अर्ज १७ त्यांनी घेतला पाहिजे. आणि संबंधित अधिकाऱ्याला दाखवलं पाहिजे की मोजणीचे मत जे आहे. त्यामध्ये एकतर कमी किंवा जास्त पोल मतदान झाले आहे. असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा..“भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका”, वर्षा गायकवाडांनी भाजपवर हात धुवून घेतला
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
हेही वाचा“तर नरेंद्र मोदी कचऱ्याच्या डब्यात पडले असते”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला अन् आमच्यावर फणा काढून गेला”, ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात