मुंबई : मुंबई महानगरपालिकेत १ लाख ४५ हजार १११ पदांपैकी तब्बल ५२ हजार २२१ पदं रिक्त आहेत. एवढी हजारोंच्या संख्येनं जागा रिक्त असताना पदं भरली का जात नाहीत ? असा सवाल कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे. तसेच बाहेर मोदी नो मिक्सच्या प्रतापामुळे सुशिक्षित युवा बेरोजगारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्यासाठी रोजगारांच्या संधी महापालिकेत उपलब्ध करून दिल्यास काही बिघडणार आहे का ? असा संतापजनक सवालही त्यांनी केलाय.
हेही वाचा…“नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात सांगेन की शरद पवारांनी माझ्यावर..,” सुनील शेळकेंचं पवारांना प्रत्युत्तर
भाजपला केवळ श्रीमंतांचाच पुळका आहे. गरिबांच्या पोरांनी नुसतं शिकून नोकरीसाठी वनवन भटकावं असा त्यांच्या उद्देश आहे. मुंबई महानगरपालिकेची पदं न भरता कामं सरसकट खासगी कन्सल्टंट आणि कंत्राटदारांच्या हवाली करून महानगरपालिकेच्या स्वायत्ततेला धक्का पोहोचवण्याचा यांचा अजून एक डाव आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की, जाणीवपूर्वक ही ५२ हजारांहून अधिकची पदं रिक्त ठेवण्याचं काम हे करत आहेत. स्वार्थ कसा साधावा ते या सरकारकडून शिकावं. असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा..“..लक्षात ठेवा मलाही शरद पवार म्हणतात,” शरद पवारांनी शेळकेंना दिला इशारा
दरम्यान, संबंधित जागा रिक्त राहिल्यानं तरुण पिढी रोजगारापासून वंचित राहत आहेच, शिवाय याचा थेट परिणाम मुंबई शहरातील पालिकेच्या कामकाजावर होताना दिसत आहे. रस्ते, वीज, पाणी, नाले-गटार, शाळा, आरोग्य इत्यादींशी निगडित कामांचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छतेच्या नावानं नुसती बोंबाबोंब आहे. परिस्थिती बिकट असताना मात्र या सरकारला कशाचं काही सोयरसुतक नाही. रोजगार देण्याची यांची नियत नाही. इच्छाशक्ती ही नाही. केवळ पोकळ आणि बोगस आश्वासनांची झोळी घेऊन जनतेच्या पैशानं हे सरकार देशभर “गॅरेंटी” या एका शब्दाच्या नावाखाली सर्वांनाच भूल देत आहेत. पण जनता काही दूधखुळी नाही. जनतेला होणाऱ्या नाहक त्रासाची भरपाई यांना मतपेटीतुन करावी लागणार आहे हे नक्की. असा इशाराही त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
हेही वाचा…शरद पवारांचा शेळकेंना सज्जड दम, फडणवीस ढाल बनून आले पुढे, म्हणाले…
हेही वाचा“तर नरेंद्र मोदी कचऱ्याच्या डब्यात पडले असते”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला अन् आमच्यावर फणा काढून गेला”, ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
हेही वाचा..“मुंबई पालिका भ्रष्टाचाराचे आगार, 700 कोटींच्या कंत्राटावर डल्ला”, विरोधकांचा हल्लाबोल