मुंबई : मेलो तरी शिवसेना सोडणार नाही, अस म्हणणारे देखील सोडून गेले असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. तसेच तसेच माझ्यातील जिद्द असूनही कायम आहे, त्य़ामुळे शिवसेना कधीही सोडून जाणार नाही. एकनाश शिंदे यांच्यासाठी काय कमी केलं. माझ्याकडील दोन खातं त्यांना दिलीत. त्याचबरोबर त्यांना मंत्रिमंडळातील महत्वाचं खात नगरविकास विभाग दिलं. तरी देखील त्यांनी माझा घात केला, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. आज शिवसेनेच्या जिल्ह्याप्रमुखांची बैठकीमध्ये बोलताना म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी जो काही शिवसेनेविरोधात बंड केलं आहे. ते सर्व भाजपने केलं आहे. त्यांच्या आग्र्याहून सुटका करावीच लागेल. बाळासाहेबांच लाडकं आपत्य म्हणजे शिवसेना आहे. त्यामुळे मी लायक नसेल तर मुख्यमंत्री पद देखील सोडायला तयार आहे. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊन देखील त्यांच्यासोबत राहिलो. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता लोकांमध्ये जाऊन दाखवा, असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांना चांगलाच इशारा दिला आहे.
“राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या बैठकीत जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. ज्या पक्षप्रमुखांनी ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनीच विश्वासघात केल्याचं आदित्या ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री पदामुळे खुर्ची हलतेय मात्र ती मानेच्या दुखणेमुळे हलत आहे. असंही ते म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या तब्ब्येतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांची विचारपुस केली आहे.
सगळं ठरलंय, फडणवीस मुख्यमंत्री, अन् शिंदे साहेब उपमुख्यमंत्री; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
शिवसेना आणि ठाकरे हे नाव न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. तसेच मुख्यमंत्री पद मान्य नसणे ही राक्षसी वृत्ती आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना लक्षात ठेवावं असा इशाराही देखील उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर घणाघात केला आहे. त्यामुळे एकप्रकारे आता शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाली आहे.
सगळं ठरलंय, फडणवीस मुख्यमंत्री, अन् शिंदे साहेब उपमुख्यमंत्री; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
दरम्यान, झाडाचं फुलं फांदी न्या, पंरतु तुम्ही झाडाचं मुळ नेऊ शकत नाही. बंडखोर आमदारांकडून शिवसेना फोडण्याचा पाप केलं जात आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी प्रथमच शिवसेनेच्या आमदारांना बंडखोर असा उपरोधिक टोला लगावला आहे. आपलीच काही लोक घेऊन शिवसेनेवर सोडण्यात आली. सेनेच्य़ा अस्तित्वात निष्ठा काय असते ती आता दाखावावीच लागेल.
Read also:
- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गुवाहाटी सोडण्याचं आसाम काॅंग्रेसचं आवाहन
- आसाममध्ये भयंकर पूर असतानाही त्यांची ‘महाशक्ती’ मात्र बंडखोरांना सांभाळण्यातच व्यस्त
- बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र
- “नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत