मुंबई : साधुसंताबाबत वादग्रस्त वक्तव्य असलेले एक सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात जोरदार आंदोलने केलीत. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जहरी टिका केली आहे.
शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांनाही जामीन मंजूर.. हार घालत समर्थकांचा मोठा जल्लोष
ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळसे, अशी अखंड परंपरा असलेला महान वारकरी संप्रदाय हा जगाचा अभ्यासाचा विषय ठरला आहे आणि इथे महाराष्ट्रात कोणीतही कालपरवाच चर्चेत आलेल्या सुषमा अंधारे या वारकरी संप्रदायचा अपमान करतात वारकऱ्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवतात? अशी नाराजी आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.
“नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी
तसेच याप्रकरणावरून शेलारांना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हा महाराष्ट्र द्रोह नाही का? असा सवाल करत आपली त्यांना मुकसंमती आहे का ? असा सवालही शेलारांनी केला. तसेच हिंदु देवदेवता आणि संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का ? असा सवाल करत तुम्ही विठ्ठलाच्या पुजेला गेलात, आणि पदस्पर्शही केला नाहीत. त्याचाच हा पुढचा टप्पा आहे का ? असा सवालही शेलारांनी केला.
“त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली”; अजित पवारांचा राज्य सरकारवर संताप
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी देखील या संपुर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं असून हे व्हिडीओ 2009 मधले असल्याचं त्यांनी सांगितले आहे. तसेच यावरून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून सर्वांची माफी मागते. असंही काल सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं.
मा. उद्धव जी ठाकरे हा महाराष्ट्र द्रोह नाही का?
◆आपली त्यांना मुकसंमती आहे का?
◆हिंदू देवदेवता आणि संत परंपरेच्या अपमानासाठी सुषमाताईंच्या नेतृत्वात नवी सेना उघडलेय का?
◆तुम्ही विठ्ठलाच्या पुजेला गेलात, आणि पदस्पर्शही केला नाहीत त्याचाच हा पुढचा टप्पा आहे का?
२/२— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 15, 2022
Read also
- “हे चित्र पाहून कर्नाटक पुढे महाराष्ट्र लाचार, असे चित्र उभे करण्याचा हा भाजपचा डाव”
- “सुषमाताई, बाळासाहेबांची आता नाक घासून माफी कधी मागणार”; मनसेची आक्रमक भूमिका
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अखेर गृहमंत्र्यांनी तोडगा काढला, म्हणाले…;
- “जिकडे सत्ता तिकडे पुढेच बच्चू कडू चिपळ्या वाजवयाला पुढे असतात”; राऊतांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर
- “निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही, त्यासाठी..;” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेेंना टोला