मुंबई : निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही. त्यासाठी मैदानात उतरावं लागतं. मनसेच्या 13 आमदारांना जनता केव्हाच विसरून गेली आहे. असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. त्यावर आता शिवसेनेच्या नेत्यांकडून बच्चू कडू यांच्यावर कडाडून टिका केली आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला हाणला आहे.
जिकडे सत्ता असते. तिकडे बच्चू कडू जातो. उद्या जर आमचं सरकार आलं तर आमची पाटी घेऊन ते पुढे असतात. असं म्हणत संजय राऊतांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला. तसेच तुम्ही त्यांना परत तुमच्या सरकारमध्ये घेणार का ? असा सवाल पत्रकारांनी केला असता संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये असे अनेक लोकं आहेत की त्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. सत्ता आली की ते सर्वात चिपळ्या वाजवायला पुढे असतात. असा टोलाही राऊतांनी हाणला.
“नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय, त्यांच्यावर कारवाई होईल का?” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बच्चू कडू यांनी अगोदर रवी राणांनी जे आरोप केले आहेत. त्या आरोपाचं अगोदर उत्तर दिलं पाहिजे. असं म्हणत अंबादास दानवे यांनी देखील बच्चू कडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला तर बच्चू कडू हे कडूच आहेत. ते गोड कसे बोलणार, अशी टिप्पणी खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान, एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. निव्वळ फेसबुकवर गप्पा मारून चालत नाही तर त्यासाठी मैदानात उतरावं लागतं. मनसेच्या 13 आमदारांना जनता केव्हाच विसरून गेली आहे. परंतु मला लोकांनी चारवेळा निवडून दिलं आहे. त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात. असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
Read also
- “निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही, त्यासाठी..;” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेेंना टोला
- शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांनाही जामीन मंजूर.. हार घालत समर्थकांचा मोठा जल्लोष
- “नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी
- “त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली”; अजित पवारांचा राज्य सरकारवर संताप
- “तुषार भोसले आणि हा कंपू गॅंग म्हणत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्ला”