मुंबई : निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही. त्यासाठी मैदानात उतरावं लागतं. मनसेच्या 13 आमदारांना जनता केव्हाच विसरून गेली आहे. असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. तसेच बच्चू कडू चारवेळा निवडून आला आहे. परंतु अजूनही लोकं मला विसरली नाहीत. असंही बच्चू कडूंनी म्हटलं.
“नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय, त्यांच्यावर कारवाई होईल का?” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळी बच्चू कडू यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने निशाणा साधला गेला. त्यालाच आता बच्चू कडू प्रत्युत्तर देत आहेत. मी कधीच जाती, धर्माचा झेंडा लावला नाही. सामान्यांना आपलं वाटलं पाहिजे, हा आमचा माणुस आहे हे वाटलं पाहिजे. त्यावेळी मतदान करताना जात पाहात नाही. मागील वीस वर्षात मंदीर, मशिदीचे वाद लावले नाही. ते लावले असते तर 10 आमदार निवडून आले असते. असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जहरी टिका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अनेकांनी मंत्रीपद मागितली. पण बच्चू कडूंनी थेट मंत्रालय आणले. केवळ सरपंच नाही,तर आख्खी ग्रामपंचायत आणण्याचंही बच्चू कडू यांनी नमुद केलं. बच्चू कडू यांच्या टिकेला आता शिवसेनेनेही प्रत्युत्तर दिलं आहे. जिकडे सत्ता जिकडे बच्चू कडू असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Read also
- शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांनाही जामीन मंजूर.. हार घालत समर्थकांचा मोठा जल्लोष
- “नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी
- “त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली”; अजित पवारांचा राज्य सरकारवर संताप
- “तुषार भोसले आणि हा कंपू गॅंग म्हणत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्ला”
- उद्धव साहेब म्हणजे अढळ निष्ठा अन् विश्वासाचं प्रतीक..! राष्ट्रवादीचा माजी आमदार अन् भाजपचे कार्यकर्ते सेनेत दाखल