नवी दिल्ली : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात सीमावाद निर्माण झाला होता. या वादाचा शेवट आणि त्यावर संवैधानिक मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व कर्नाटचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आज यासंदर्भात चर्चा करण्यास बोलवले होते. दोन्ही बाजूंशी भारत सरकारच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आले. त्यामुळे जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही. तोपर्यंत याबाबत कोणत्याही राज्याने वक्तव्य करू नये. असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर तोडगा काढला. तसेच त्यांनी दोन्ही राज्यातील विरोधी पक्षाला यावरून राजकारण न करण्याचं आवाहन केले.
“तुषार भोसले आणि हा कंपू गॅंग म्हणत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्ला”
केंद्राने न्यायाची बाजू घ्यावी, ही आमची भूमिका होती. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना एकत्रित करत तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली असून, मंत्र्यांच्या या समितीला आवश्यकता भासल्यास केंद्र सरकारही मदत करेल. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वादाबाबत केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात तटस्थ भूमिका असली पाहिजे. अशी विनंती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळए कोणत्याही राज्याच्या बाजून केंद्र सरकार भूमिका घेणार नाही. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मध्यंतरी राज्याच्या बाजूने भूमिका घेतल्याची प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे केंद्राने कोणाचीही बाजू न घेता, न्यायाची बाजू घ्यावी, ही आमची भूमिका आम्ही मांडली आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील दोन मंत्री कर्नाटक जाणार होते त्यावेळी कर्नाटकने मनाई केल्याचा मुद्दा देखील फडणवीस यांनी अमित शहा यांच्यापुढे मांडला. या स्थितीचा फायदा घेऊन गोंधळ होण्याची शक्यता असल्याने इनपुट त्या सरकारकडे होते आणि त्यामुळे त्यांनी तसे पत्र पाठविले. कर्नाटक सरकार आता स्वत: महाराष्ट्रातील मंत्र्यांना निमंत्रित करणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.
“नितेश राणेला सत्तेचा माज चढलाय, त्यांच्यावर कारवाई होईल का?” राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान, त्याआधी या बैठकीतून अमित शहा यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. दोन्ही राज्यांचे प्रत्येकी 3 असे 6 मंत्री यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीवर सीमावादावरील सर्व मुद्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी असेल. तसेच सुप्रीम कोर्टाचा निकाल येत नाही, तोवर कोणतेही राज्य वाद उत्पन्न होतील, अशी विधाने करणार नाहीत. कायदा-सुव्यवस्था चांगली राहिल. याची काळजी दोन्ही राज्यांकडून घेतली जाईल. बनावट ट्विटर खात्यांच्या माध्यामांतून काही खोटी माहिती प्रसारीत करण्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.
Read also
- “जिकडे सत्ता तिकडे पुढेच बच्चू कडू चिपळ्या वाजवयाला पुढे असतात”; राऊतांचं बच्चू कडूंना प्रत्युत्तर
- “निव्वळ फेसबुकवर पोकळ गप्पा मारून चालत नाही, त्यासाठी..;” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेेंना टोला
- शाईफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांनाही जामीन मंजूर.. हार घालत समर्थकांचा मोठा जल्लोष
- “नकळत काही चुकीचं बोललं असेल तर..”; सुषमा अंधारेंनी मागितली हात जोडून माफी
- “त्याची किंमत त्यावेळच्या राज्यकर्त्यांना चुकवावी लागली”; अजित पवारांचा राज्य सरकारवर संताप