पुणे : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींबाबत सुरू असलेल्या खटल्यामध्ये पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी घेतली आहे. त्यामुळे बैलगाडा शौकीन अन् शेतकऱ्यांना शर्यतींच्या परवानगीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आम्हाला गाफील ठेऊन अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमचा गेम केला – गिरीश महाजन
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत आज (दि. ६ ) सुनावणीस सुरुवात झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून ॲड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे संदीप बोदगे यांनी दिली.
अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल
दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीसाठी नवी दिल्ली येथे धाव घेतली होती. त्याच्यासोबत माजी महापौर राहुल जाधव आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती सशर्त सुरू करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायदा केलेला आहे. परंतु, या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तात्काळ घेतली जावी याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार आज सकाळी सुनावणीस सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे दिल्ली दौऱ्यावर निघाले आहेत.
न्यायालयीन लढाईत आम्ही निश्चितपणे यशस्वी होवू : आमदार लांडगे
२०११ पासून राज्यातील बैलगाडा शर्यत प्रेमी आणि शेतकरी न्याय मागत आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने कायदा केला. मात्र, प्राणीप्रेमी न्यायालयात गेले. आता सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मला खात्री आहे की, न्यायालयीन लढाईत राज्यातील बळीराजा आणि बैलगाडा शौकीन निश्चितपणाने विजयी होणार आहेत. पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार असल्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. विजयाची प्रतीक्षा आहे, पण आम्ही या लढ्यात यशस्वी होणार असून, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा अधिकार आम्हाला निश्चितपणे मिळणार आहे, असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
Read Also :
- “नार्वेकरांचं ‘मातोश्री’शी भांडण झालं की काय?, कळत नाही!”
- दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
- सरकार पडणार असे म्हटलं तर कोणाच्या पोटात का दुखतं?; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोमणा
- हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
- संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश