ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने धाड मारली आहे. पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालय आणि घरांवरही धाडी मारण्यात आल्या आहेत. त्यावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी खरे गुन्हेगार शोधावेत. अन्यथा या यंत्रणांवर कुणाचाही विश्वास बसणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न, कोणी केला हल्ला?
ठाण्यात महारक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी झाला पाहिजे. त्याचा दुरुपयोग होऊ नये. नाहीतर यंत्रणांवर कुणाचाही विश्वास राहणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणेने खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी, असं शिंदे म्हणाले.
धाडी टाकून आमच्या नेत्यांची बदनामी, भाजपाने राष्ट्रवादीचा इतका धसका का घेतलाय? – जयंत पाटील
यावेळी त्यांनी महारक्तदान शिबीरावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही महारक्तदानाचे आयोजन केले आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्याने रक्तदान शिबीराचा कार्यक्रम घेतला आहे. अनेक जण या ठिकाणी रक्तदान करत असून या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या शिबीराला शुभेच्छा दिल्या आहेत, असं सांगतानाच रक्तदानाचे काम मोठे आहे आणि ते धाडस फक्त शिवसेनेत आहे. शिवसेना कोणत्याही दबावाला घाबरणार नाही. लोकोपयोगी कामे शिवसेना करतच राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- चिपी विमानतळाच्या उद्धाटन कार्यक्रमाचं विरोधी पक्षनेत्यांना साधं निमंत्रणही नाही; दरेकरांची नाराजी
- दिल्लीच्या तख्तापुढं सह्याद्री झुकला नाही, झुकणार ही नाही – सुप्रिया सुळे
- …अन् लोकांनी भाजपला येडी ठरवलं; ‘तो’ किस्सा सांगताना शरद पवारांना गुदगुल्या
- प्रत्येक गोष्टीची नोंद होतेय, अपना टाईम भी आयेगा; संजय राऊतांच सुचक वक्तव्य
- ड्रग्स पार्टीत भाजपच्या हायप्रोफाईल नेत्याचा मेहुणाही सामील; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट