अमरावती : आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी शेतकर्त्यांच्या प्रश्नावरून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलनाची तयारी केली होती, आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मातोश्री वर धडक देण्यासाठी मुंबईत प्रस्थान केलं होत. त्यांना पोलिसांनी अटक केली असून आता त्यांना तुरुंगात टाकलं गेलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात हुकूमशाही चालवली आहे. आज आणीबाणीच्या काळाची आठवण येते. शेतकऱ्यांसाठी आवाज उचलला म्हणून तीन दिवस जेलमध्ये ठेवलं. शेतकऱ्यांनाही अटक केली. आता मुंबईत जाण्यापासून रोखलं. अशाप्रकारच्या हुकुमशाहीमुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे”, असा घणाघात आमदार रवी राणा यांनी केला.
आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थासमोर उद्या (16 नोव्हेंबर) आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, राणा दाम्पत्य मुंबईला रवाना होण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस आयुक्तालयात दाखल केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मला आणि खासदार नवनीत राणा दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी व्हॅनमधून पोलीस आयुक्तालयात आणलं. माझी रात्री आठ वाजता मुंबईची गाडी होती. पण रेल्वे स्टेशनला जाण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं”, अशी माहिती राणा यांनी दिली.
हजारो शेतकऱ्यांचे जे नुकसान झालं, शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली, त्याबद्दल मी आवाज उचलला. पण मला तीन दिवस जेलमध्ये टाकलं. आज जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी निघालो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ताब्यात घेतल, असं रवी राणा म्हणाले.
मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारायचं आहे की, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांविषयी आणि लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आलेलं वाढीव वीजबिल कमी करावं, यासाठी कुणी आवाज उचलला तर त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकाल? मुंबईमध्ये जाण्यासाठी बंदी आणाल? शेतकऱ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखाल?, असे सवाल रवी राणा यांनी केले.
Read Also :
ही ‘श्रींची इच्छा! मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत…
आयुष्यात काय कमावलं ? बाळासाहेब थोरात म्हणाले…
राम कदम ढोल ताशे वाजवत, गुलाल उधळत जाणार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण
आशिष शेलारांकडे मोठी जबाबदारी, ‘या’ निवडणुकीसाठी सहप्रभारी नियुक्ती
‘उशिरा सुचलेले शहाणपण’, धार्मिकस्थळे उघडण्यावरून आठवलेंचा सरकारला टोला