ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक बोलवली होती. या बैठकीत संसदेने विशेष पाच दिवसाचं अधिवेशन बोलवलं आहे. त्यामुळे लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला तयारी करायची आहे. यातच मुख्यमंत्र्याच्या मुलाला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला घरी पाठवायचं आहे. असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.
हेही वाचा…अबब..! इंडिया नाव भारत करण्यासाठी ‘इतके’ कोटी खर्च होणार, आकडा ऐकून थक्क व्हाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे सध्या कल्याण मतदारसंघातून खासदार आहेत. तर ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन विचारे खासदार आहेत. या दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली होती. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर आपलाच भगवा फडकला पाहिजे, असा निर्धार ठाकरेंनी या बैठकीत केला आहे. तसेच काहीही करून कल्याण लोकसभा जिंकायची आहे. श्रीकांत शिंदे यांना घरी बसवायचे आहे. असंही ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत.
हेही वाचा…“माझे बाबा हट्टी, बाबांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर..,” जरांगे पाटलांच्या मुलीने सरकारला दिला इशारा
दरम्यान, राज्यात पक्षफुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. यातच इंडिया आघाडीच्या बैठका सुरू असतांना दुसऱ्या बाजुला केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आहे. त्यामुळे देशात लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जालन्यात मुख्यमंत्र्यांनी उपोषण करायला सांगितले, तर लाठीचार्जचे आदेश फडणवीसांनी दिलेत”
हेही वाचा…सभागृहात पेन ड्राईव्ह दिला, ‘त्या’ प्रकरणात संपादकांवर गुन्हा दाखल, पण सोमय्यांवर का नाही ?
हेही वाचा…शेतकऱ्यांसाठी खूशखबर.., कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत
हेही वाचा…लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर कोण ? आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…“आता पंतप्रधानांना संबोधित करताना प्राईम मिनिस्टर ऑफ बीजेपी असं म्हणायचं का ?” बड्या खासदाराचा सवाल