पुणे : कसब्यातील पोटनिवडणुक प्रचाराच्या अंतिम टप्प्याच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार, उद्धव ठाकरे आणि काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आमची इच्छा होती की कसब्याची निवडणुक बिनविरोध व्हावी, पण महाविकास आघाडीने ते होऊ दिलं नाही. परंतु काही हरकत नाही. आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…“काँग्रेसने एलबीटी कर आणला, तो फडणवीसांनी बंद केला”, कसब्यात चंद्रकांत पाटलांचा घणाघात
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅली काढली. या रॅलीत भाजपच्या प्रमुख नेत्यांसह शिंदे गटातील नेते, आमदार खासदारही यावेळी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. निष्ठा काय असते ते मुक्ताताई टिळक आणि गिरीश बापट यांनी दाखवून दिले आहे. गिरीश बापट यांना आम्ही आजारी असल्यामुळे प्रचारात येऊ नका असं सांगितले पण त्यांनी एकलं नाही. त्यांनी प्रचारात येऊन हेमंत रासने यांना बळ दिले. मुंबईत आम्ही उमेदवाराला भरलेला फॉर्म माघारी घेतला. पण इथं तसं घडलं नाही. विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू आहे. असा आरोप शिंदेंनी विरोधकांवर लावला.
हेही वाचा…“पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार”, रासनेंसाठीचा मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ गेमचेंजर ठरणार का ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही अनवधानाने माझ्या तोंडून काल लोकसेवा आयोगाचं निवडणून आयोग झालं. परंतु यामध्ये रिजल्डला महत्व आहे. मग ते निवडणुक आयोग असो की लोकसेवा आयोग रिझल्टला महत्व आहे. त्यामुळे रिझल्टचं काम देण्याचं काम करणारं आताचं सरकार आहे. आम्ही चुकीच्या ठिकाणी जात नाही. असं म्हणत आम्ही कृष्णाच्या काठावर प्रायश्चित करण्याची वेळ कुणावर आली आहे. हे आम्ही सांगत नाही. असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.
Read also
- हेही वाचा…“निवडणुक आयोग काय लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व,” शिंदेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर
- हेही वाचा…“कसब्याची जागा नुसती जिंकून उपयोगाची नाही, तर मोठ्या मताधिक्याने जिंकायचीय,” चंद्रकांत पाटील
- हेही वाचा…दिल्ली, पंजाबचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेटीला, मोदीविरोधात आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली
- हेही वाचा..““भाजपचे आक्रस्ताळे नेते फडणवीस आणि चित्रा वाघांसारखे वाचाळ कार्यकर्ते धर्माच्या नावाने पळापळ करताय”
- हेही वाचा…राणेंना बाईनं पाडलं, अजित पवारांची टोलेबाजी, त्यात राऊतांनीही तेल ओतलं, म्हणाले, कमाल की चीज..