मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील वर्ग १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. यासंदर्भातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर विभागाने आदेश काढला आहे.
मायकेल लोबो यांना दणका: परुळेकरांच्या प्रवेशाने बार्देजमध्ये भाजपाची ताकद वाढली!
सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व अन्य शैक्षणिक संस्थांमधील वर्ग १ फेब्रुवारीपासून ऑफलाइन सुरू होतील. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विभागाने घेतला होता. तथापि, राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. विद्यापीठ व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनास विचारुनच घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे.
दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून राज्यातील महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांच्या आदेशाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे..महाविद्यालयात येताना विध्यार्थ्यांनी दोन्ही लसिकरण केलेले असणे आवश्यक आहे.
— Uday Samant (@samant_uday) January 25, 2022
तसेच, विद्यापीठे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरांवर निर्णय घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन विद्यापीठाने हेल्पलाईन जारी करावी. तसेच, विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षांसंदर्भात नमुना प्रश्नसंच, मार्गदर्शन सूचना आणि अभ्यासक्रम प्रकाशित करावा, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
Read also:
- महाविकास आघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
- महावितरणाविरोधात आंदोलन करण्याचा भाजपला अधिकार नाही – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
- किरीट सोमय्या भाजपचा ‘आयटम गर्ल’; मंत्री नवाब मलिकांच आक्षेपार्ह वक्तव्य
- सत्तेसाठी काँग्रेस अन् शिवसेनेत लाचारीची स्पर्धा लागली; भाजप नेते आशिष शेलारांचा घणाघात
- आमदार नितेश राणे प्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी