मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात तापलेल्या शिसासारखा धगधगत असून, विरोधकांनी यावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लबोल चढवला आहे. तसेच, भाजपने मराठा समाजाच्या आंदोलनाला आणि मोर्चांना पाठिंबा जाहीर केला असून, यावरून काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.
“मराठा आरक्षणाला घेऊन भाजपाने घेतलेली भूमिका ही फक्त दिखावा म्हणू घेतली असून, त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचं केवळ राजकारण करायचं आहे,” या शब्दांत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून ट्विट केले असून, काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची ही दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आणल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी #मराठाआरक्षण बाबत भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत.
आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा दिखाऊ असून, या मुद्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, हे स्पष्ट आहे.@sachin_inc— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 27, 2021
सचिन सावंतांबद्दल ट्विटमध्ये बोलताना त्यांनी, “सचिन सावंत यांनी भाजपाची मराठा आरक्षणासंदर्भातली दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा जाहीररित्या चव्हाट्यावर आणली आहे. आज त्यांनी मांडलेले मुद्दे हे अतिशय गंभीर आहेत. भाजपचा मराठा आरक्षणाबाबत कळवळा हा केवळ दिखाऊ असून, त्यांना केवळ मराठा आरक्षणचं राजकारणच करायचं आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे,” असं ते म्हणाले आहेत.
एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे pic.twitter.com/dbukDpAq1L
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 27, 2021
दरम्यान, सचिन सावंत यांनी ट्विट करून, “एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे,” असा निशाणा भाजपवर साधला आहे.
Read Also :
- लॉकडाऊन कायम, मात्र निर्बंध शिथील होणार; कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
- “महाराष्ट्र झोपेत असताना सरकार पडेल,”
- पवारांची भेट घेवून संभाजीराजेंना काहीही साध्य होणार नाही – विनायक मेटे
- ‘महाविकास आघाडीचा जो अंतिम निर्णय तो आम्हाला मान्य’ – नितीन राऊत
- ‘राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’