मुंबई : दीड वर्षांपासून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. घटक पक्षाच्या काही नेत्यांवर करण्यात आलेले गंभीर आरोप, सीबीआय, ईडी, एनआयकडून सुरु असलेल्या काही नेत्यांच्या चौकश्या, पोलीस दलामध्ये असलेली नाराजी, महामारीचे संकट, त्यात आलेले चक्रीवादळासारखे अस्मानी संकट, उजनी पाणी प्रश्न आणि आता मागासवर्गीयांच्या पदन्नोतेतील आरक्षणाचा, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार पुरते अडचणीत सापडले आहे.
दरम्यान, या मुद्द्यांवरून मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधली धुसफूस आणि घटक पक्षांमधल्या कुरबुरी वाढल्या असून, राज्यातले सरकार लवकरच गडगडणार असल्याच्या अफवांना राजकीय वर्तुळात पेव फुटले आहे. विरोधक देखील सातत्याने यासंबंधातले वक्तव्य करत असून, दुसरीकडे सरकारमधले मंत्री मात्र, आघाडी सरकार ५ वर्ष टीकेल अशा वल्गना करत आहेत.
यातच आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा सरकारविरोधात खळबळजनक वक्तव्य केले असून, देवेंद्र फडणवीस मध्यंतरी म्हणाले होते, “झोपेतून उठलो तर सरकार गेलं होतं, इतका विश्वासघात झाला. केसाने गळाने कापतात म्हणतात ते हे. तुम्ही सरकार कधी पडणार विचारत आहात, मी सांगतो की, असेच सगळे झोपेत असतील तेव्हा हे सरकार पडेल आणि कुणाला कळणारच नाही आघाडी सरकार कधी गेलं,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी ते बोलताना केला आहे.
Read Also :
- पवारांची भेट घेवून संभाजीराजेंना काहीही साध्य होणार नाही – विनायक मेटे
- ‘महाविकास आघाडीचा जो अंतिम निर्णय तो आम्हाला मान्य’ – नितीन राऊत
- ‘राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही’
- ‘सोनिया गांधीच्या पत्राचीही दखल नाही! आता आम्हाला विचार करावाच लागेल’
- ‘आघाडी सरकारवर पवार साहेबांचा वरदहस्त; त्यामुळे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार!’