नागपूर : गेल्या काही दिवसांपासून शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी गुरूवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात सायकली चालवून आपला निषेध नोंदवला. त्यांचे हे अनोखे सायकल आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी पावसात भिजत एकच गर्दी केली होती.
‘’ज्यांना तुम्ही शत्रू समजता त्यांना आम्ही किंमत ही देत नाही’’ निलेश राणे म्हणतात…
यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी ही टीका केली. मोदींच्या मंत्री मंडळातून चांगल्या मंत्र्यांना, काम करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. संजय धोत्रे हे चांगलं काम करत होते. त्यांनाही मंत्रिमंडळातून काढलं आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना ठेवलं आहे. ज्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार नाही, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवलं आहे, असं सांगतानाच कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. कोरोनामुळे देशात अनेकांचे जीव गेले. हा मोदींच्या ढिसाळ कारभारामुळेच हे घडलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा होता, असं पटोले म्हणाले.
अधिवेशातील राड्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना सुरक्षा, गृह खात्याचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता. तर मोदीच सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा सणसणीत टोला नाना पटोले यांनी लगावला. महागाईच्या विरोधात आज नागपूरात काँग्रेसने सायकल यात्रा काढली. भर पावसात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. मुसळधार पावसात भिजत नाना पटोले, कॅबिनेट मंत्री सुनील केदार या सायकल यात्रेत सहभागी झाले. यावेळी काँग्रेस आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, प्रवक्ते अतुल लोढे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सायकल यात्रेत सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी, खाद्यतेलाच्या महागाई विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय.
चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट
उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०० रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा निषेध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- राणेंना मिळालेलं मंत्रीपद, त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही! मात्र आमच्या शुभेच्छा!
- आजारी खडसेंची ईडीकडून चौकशी सुरु, दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकला…ठाकरे सरकारकडून पुन्हा एकदा आयोगाला विनंती
- ‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
- चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट