मुंबई : काल पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजप सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या मंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळ फेरबदलात, काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला, काहींच्या खात्यात फेरबदल झाले, तर एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे.
पवारांनी मला फोन करून मनापासून शुभेच्छा दिल्या, मुख्यमंत्री ठाकरेंचे मन मात्र तेवढे मोठे नाही – राणे
दरम्यान, राज्यातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार या ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे. मात्र, खातेवाटपाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. यात राणेंवर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आजारी खडसेंची ईडीकडून चौकशी सुरु, दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
यावर आता, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, ”भारती पवार, कपिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसची उत्पादनं आहेत, तर राणेंना मिळालेलं मंत्रीपद, त्यांच्या कारकिर्दीला साजेसं नाही! त्यांना जे पद मिळालं, त्यापेक्षा त्यांची उंची मोठी. मात्र, तरीही आमच्या राणेंना शुभेच्छा! भाजपने शिवसेना-राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून त्यांना जो पुरवठा झाला, त्यामुळेच त्यांना आत्ताच्या मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले,” अश्या उपाहासात्मक शब्दांत त्यांनी राणेंना आणि भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत.
चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट
“अनेक अनुभवी आणि जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून, मोदी सरकारने या विस्तारात नव्या चेहऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. नक्कीच त्यांची क्षमता पाहूनच पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. आता या मंत्र्यांनी राज्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान द्यावं. दरम्यानच्या काळात छोटे उद्योग मरून पडले होते. आता राणेंनी रोजगार आणि उद्योगांना नवसंजीवनी द्यावी,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
Read Also :
- भुजबळ आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर, कार्यकर्ते मात्र बाहेर एकमेकांशी भिडले
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकला…ठाकरे सरकारकडून पुन्हा एकदा आयोगाला विनंती
- ‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
- एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल; भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी खडसे दाम्पत्याला अटक होणार?
- अधिवेशातील राड्यानंतर आमदार भास्कर जाधव यांना सुरक्षा, गृह खात्याचा निर्णय