मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना, याच प्रकरणी मंगळवारी मध्यरात्री अटक करण्यात आली होती. तब्ब्ल १३ तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत आणि त्यांची रवानगी १२ जुलैपर्यंतईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे.
‘बाळ’कडू प्यायलेला कोकणचा भूमिपुत्र, आता ‘मोदीं’चा मंत्री; असा आहे राजकीय प्रवास
दरम्यान, जावई गिरीश चौधरी यांच्यावरच्या या अटकेच्या कारवाईनंतर ईडीने, खडसेंनाही समन्स बजावलं होतं. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. तसेच, या चौकशीच्या पार्श्वभूमीवर खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र, त्याअगोदरच प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि अस्वास्थ्यामुळे त्यांनी परिषद रद्द केली.
एकनाथ खडसे ईडी कार्यालयात दाखल; भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी खडसे दाम्पत्याला अटक होणार?
मात्र, सकाळी अकराच्या सुमारास ते अंमलबजावणी संचलनायच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी, “मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर, माझ्यामागे ईडी लावण्यात आली. मला यामागे कुठेतरी राजकीय वास येत आहे. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत आहे, कोणीतरी हे सर्व करत आहे, पण खरं काय ते उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. याच काय मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, सक्षम आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
भोसरी जमीन आर्थिक घोटाळा: जावयाच्या अटकेनंतर आता एकनाथ खडसेंना दणका, ईडीकडून चौकशीचे समन्स
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरण : अटकेनंतर खडसेंच्या जावयाला ५ दिवसांची ईडी कोठडी
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.
Read Also :
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकला…ठाकरे सरकारकडून पुन्हा एकदा आयोगाला विनंती
- चर्चा होती राजीनाम्याची, मात्र लॉटरी लागली थेट राज्यमंत्रीपदाची! मोदींकडून ‘दाजींना’ मोठे गिफ्ट
- केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
- मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?
- नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन, भाजपने खेळली मोठी राजकीय खेळी; नेमकं गणित काय? वाचा सविस्तर