मुंबई : आज सकाळी पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी १३ तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
“मग प्रकरण दडपण्यासाठी फडणवीसांची ईडीने चौकशी का करु नये?”
दरम्यान, यानंतर आता ईडीकडून गिरीश चौधरी यांच्यावर अजून एक कारवाई करण्यात आली असून, १२ जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असेल, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.
Read Also :
- “मंत्रिमंडळ विस्तार करा किंवा नका करू, ७ वर्षांत तुम्ही केलेली पापं धुवून काढता येणार नाहीत”
- मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना, नियमांचे काटेकोरपणे पालन करा!
- मोठी बातमी! रावसाहेब दानवेंचा खुलासा, राजीनामा मागितला नाही; मी केंद्रातच!
- ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान, कोण आहेत कपिल पाटील?
- नगरसेवक ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री; असा आहे औरंगाबादच्या भागवत कराड यांचा प्रवास