मुंबई : भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
“काल प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील; भाजपासून सावधान आणि सतर्क रहा!
दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी, भाजप आणि फडणवीसांवर ट्विट करून निशाणा साधला आहे. “एकनाथ खडसे यांना ACB व झोटींग आयोग चौकशीनंतर फडणवीस सरकारने क्लीन चिट दिली. पण खडसेंनी पक्ष बदलला आणि त्यांची मोदी सरकारने ED चौकशी लावली व त्यांच्या जावयाला अटक केली. वाझेची नियुक्ती कोणी केली याची चौकशी सीबीआय ला हवी मग फडणवीस यांची प्रकरण दडपण्यासाठी इडीने चौकशी का करु नये?,” असा सवाल त्यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांना ACB व झोटींग आयोग चौकशीनंतर फडणवीस सरकारने क्लीन चिट दिली. पण खडसेंनी पक्ष बदलला आणि त्यांची मोदी सरकारने ED चौकशी लावली व त्यांच्या जावयाला अटक केली.
वाझेची नियुक्ती कोणी केली याची चौकशी सीबीआय ला हवी
मग फडणवीस यांची प्रकरण दडपण्यासाठी इडीने चौकशी का करु नये?— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 7, 2021
मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
आज सकाळी पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी १३ तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.
मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
‘मी पुन्हा येईन’साठी किती रडीचा डाव खेळणार? रोहिणी खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.
Read Also :
- राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर
- “अखेर काँग्रेसला हात दाखववून कृपाशंकर सिंग यांचा भाजपत प्रवेश, समीकरणे बदलणार
- अखेर रावसाहेब दानवेंची पडली विकेट; तब्बल १० मंत्र्यांचे राजीनामे
- “खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी चुकीची आणि खोटी, त्या मुंबईतच”
- वडीलांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी; दोन्ही राणे बंधु दिल्लीत दाखल