दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. मात्र, आता या बातम्यांना पुष्टी मिळाली असून, आज संध्याकाळी साडे पाच वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, हा विस्ताराचा कार्यक्रम होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे असून, २० नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“या प्रस्थापितांच्या ‘पोपटाला’ लोकप्रतिनिधींचं निलंबन, हे १२-१९च्या आकड्यांचा खेळ वाटतोय”
महाराष्ट्रातून खासदार नारायण राणे यांच नाव निश्चित मानलं जात आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राणे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यानंतर राणे आणि नड्डा यांची भेट झाल्यानंतर राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील, भागवत कराड, हिना गावित यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे खासदार सध्या दिल्लीत आहेत.
‘’बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे वागतील असे वाटले नव्हते’’
दरम्यान राज्यातून अजून एका व्यक्तीचं नाव यासाठी पुढे येत असून, नाशिकच्या खासदार भारती पवार यांचा मोदी मंत्री मंडळामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारती पवार या पुढील चर्चेसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय राज्य मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा आहे. तसेच, काही मोठ्या नेत्यांना या नेत्यांच्या बदल्यात केंद्रीय मंडळातून डच्चू मिळणार असून, अद्याप तरी नक्की किती आणि कोण कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कापला जाणार, हे स्पष्ट झाले नाहीये.
भारती पवार कोण?
भारती पवार या आधी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा होत्या. त्यांनी अनेक वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलं. त्या स्वत: एक डॉक्टर आहे आणि उच्चशिक्षित-सुसंस्कृत महिला आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्यांचं कामाचं आणि कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असून, ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क आहे.
Read Also :
- मोठी बातमी: मोदींच्या मंत्रिमंडळातून रावसाहेब दानवेंची उचलबांगडी?
- “काल प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील; भाजपासून सावधान आणि सतर्क रहा!
- जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
- “तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”
- मराठा उमेदवारांना मोठा दिलासा: २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय – अशोक चव्हाण