मुंबई : राज्याच्या विधानसभेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशनात, पहिल्या दिवशी ओबीसी आऱक्षणाचा ठराव मंजूर करताना, भाजप आमदारांनी वेलमध्ये येत गोंधळ घातला, घोषणाबाजी केली, अध्यक्षांच्या समोरील माईक ओढला. तसेच, याहीपुढे जाऊन, तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केली आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
‘’बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखे वागतील असे वाटले नव्हते’’
यामुळे भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. हे कमी होते काय, म्हणून दुसऱ्या दिवशी भाजपकडून या घटनेचा निषेध म्हणून विधानसभेबाहेर सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करत, प्रतिविधानसभा भरवण्यात आली. तसेच, कामकाजात अडथळा आणण्यासाठी आमदार रवी राणा यांनी तर थेट राजदंडच पळवला.
अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला पण तुम्ही हे विसरलात की जनतेच चिलखत आम्ही परिधान केलंय… माका तुका हा सांगुचा हा..अर्धा माडार चडून हात सोडचे न्हय…लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय येईल (2/2)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 6, 2021
दरम्यान या दोन दिवसांत एकमेकांवर केलेल्या चिखलफेकीनंतर, आज भाजपवर, अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी घातलेल्या राड्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार टीका जोरदार करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावरून भाजपवर शाब्दिक हल्लाबोल केला असून, त्यांनी २०१७ साली भाजपने केलेल्या १९ आमदारांच्या निलंबनाची आठवण करून देत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करून राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
भोसरी जमीन आर्थिक घोटाळा : एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
“लोकशाहीचा गळा घोटला गेला असताना या प्रस्थापितांच्या पोपटाला लोकप्रतिनिधींचं निलंबन हे 12-19 च्या आकड्याचा खेळ वाटतोय यावरूनच कळतं की यांची लोकशाहीवर किती निष्ठा आहे?, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- “काल प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील; भाजपासून सावधान आणि सतर्क रहा!
- जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
- “तुमची गाडी पेट्रोलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”
- मराठा उमेदवारांना मोठा दिलासा: २०१४ च्या ईएसबीसी उमेदवारांना सेवेत कायम करण्याचा निर्णय – अशोक चव्हाण
- “पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान”- मुख्यमंत्री