मुंबई : आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मोठी बातमी! रावसाहेब दानवेंचा खुलासा, राजीनामा मागितला नाही; मी केंद्रातच!
यावेळी, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी, जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन, त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे, तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही, त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून, कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिंडन्स) व्यवस्था करावी, त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान, कोण आहेत कपिल पाटील?
कोरोनाच्या दोन्ही लाटेमधील हा काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन, आपण काहीप्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो, तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी, कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.
नियमांचे काटेकोरपणे पालन करा
अजुन कोरोनाची दुसरी लाट पुर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतू, याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे, काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करतांना सावधगिरीची पाऊले म्हणून, जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
गर्दी टाळा
आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उदभवतात, त्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सण समारंभ ही सुरु होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करा
आशा- अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात जनजागृती करून, कोराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण, दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, अशी सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, लसीचे दोन्ही डोस घेऊन, कोराना बाधित होणाऱ्यांची संख्या, त्याची स्थिती आणि कारणे याचे टास्कफोर्सने विश्लेषण करावे, ही माहिती संकलित करतांना ती अनुभवजन्य राहील (लसीचा पहिला डोस घेतला होता की दोन्ही) याची काळजी घ्यावी.
जिद्द कायम ठेवा
कोरानामुक्त गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांची बैठक घेऊन, गाव कोरोनामुक्त होईल याची दक्षता घ्यावी, वस्ती केंद्रीत करून गाव कोरोना मुक्त करावे, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या, तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी केलेली तयारी आणि कोरोनाला हरवण्याची तुमची जिद्द कौतूकास्पद आहे ती कायम ठेवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
Read Also :
- नगरसेवक ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री; असा आहे औरंगाबादच्या भागवत कराड यांचा प्रवास
- १५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर..वाचा सविस्तर..
- “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली” रुपाली चाकणकरांकडून राणा दाम्पत्याचा समाचार
- “मग प्रकरण दडपण्यासाठी फडणवीसांची ईडीने चौकशी का करु नये?”
- राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर