मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात फिरत होत्या. मात्र, आता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी, हा विस्ताराचा कार्यक्रम सुरु असून, या फेरबदलात काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. काहींच्या खात्यात फेरबदल होणार आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला गेला आहे, तर एकूण ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामुळे आता, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ५३ वरून ८१ झाली आहे. यात राज्यातून ४ जणांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना, नियमांचे काटेकोरपणे पालन करा!
दरम्यान, मोदी सरकारच्या या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या मंत्री मंडळाच्या विस्तारावर विरोधकांकडून परखड शब्दांमध्ये टीका केली गेली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना, थेट पंतप्रधान आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकार गेल्या ७ वर्षांपासून फक्त सत्तेचा आनंद उपभोगत आहे आणि दुसरीकडे लोकांना बरबाद करत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करा किंवा नका करू, त्याने काहीही फरक पडणार नाही”, अशी टीका त्यांनी केली आहे.
१५ जुलैपासून राज्यातील शाळा सुरू होणार; सरकाराची नवी नियमावली जाहिर..वाचा सविस्तर..
“८ जुलैला काँग्रेसकडून, भाजप सरकारविरोधात आणि गॅस-पेट्रोल-डिझेल वाढीच्या निषेधार्थ, राज्यभर सायकल रॅली काढून आंदोलन केलं जाणार आहे. मोदी सरकारची धोरणं आणि देशातील वाढती महागाई, यांचादेखील निषेध याद्वारे करण्यात येणार आहे,” अशी माहिती देत त्यांनी, “मंत्रिमंडळ विस्तार करा किंवा नका करू, ७ वर्षांत तुम्ही केलेली पापं धुवून काढता येणार नाहीत. मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांकडे साधी त्यांच्या खात्याशी संबंधित फाईल देखील जात नाही, असं काहींना विचारलं तेव्हा कळलं. या सरकारचा सगळा कारभार पीएमओ चालवत आहे. या सरकारमुळे देशातील लोकतंत्र संपुष्टात आलेलं आहे,” असा घाणाघातही त्यांनी केला आहे.
Read Also :
- मोठी बातमी! रावसाहेब दानवेंचा खुलासा, राजीनामा मागितला नाही; मी केंद्रातच!
- ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये स्थान, कोण आहेत कपिल पाटील?
- नगरसेवक ते मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री; असा आहे औरंगाबादच्या भागवत कराड यांचा प्रवास
- मोठी बातमी! पवारांची लागणार केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी
- राज्यातून ४ नेते मंत्रीपदी, एकूण ४३ मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर, वाचा एका क्लिकवर