अकोला : गेल्या काही दिवसापासून अपक्ष आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि भाजपमधील वाद टोकाला पोहचला. माझ्या मतदारसंघात मला भाजपकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी भाजपवर केला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांचं एका गोष्टीवरून कौतूक केलं आहे.
हेही वाचा…अजिदादा पुण्याचे पालकमंत्री होताच भाजप अन् शिंदेंच्या नेत्यांमध्ये धास्ती, डीपीसीमधून ‘या’ नेत्यांची होणार गच्छंती
अकोल्याचे तत्कालीन पालकमंत्री असतांना बच्चू कडू यांच्या पुढाकाराने अकोलामध्ये हुतात्मा उभारण्यात आले होते. त्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. देशाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शूरवीर यांना अभिवादन करतो. शहिदांच्या परिवाराचे मी आभार मानतो. तुम्ही देशासाठी तुमचा सुपूत्र दिला. अशा सुपूत्रामुळे लोकशाही अबाधित राहत आहे. आपले जवान उन्हात देखील काम करतात. अकोला हा पहिला जिल्हा असेल की सर्व शहिदाचे पुतळे एका ठिकाणी संग्रहित केले असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
हेही वाचा…“बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा…!”मनसेच्या महिला नेत्याचं आवाहन सुषमा अंधारेंनी स्विकारलं
दरम्यान, बच्चू कडूंना काहीही करून पाडा असं म्हणत बच्चू कडूंना पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्न करीत आहेत. यातच किती खासदार, आमदारांची फौज आणून बच्चू कडूंना पाडून दाखवा असं आवाहनच बच्चू कडू यांना दिलं होतं. त्यानंतर बावनकुळेंनी या वादावर आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. यावर आता फडणवीसांनी बच्चू कडू यांचं कौतूक केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…नाशकात अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टॉमॅटोचा वर्षाव, शेतकरी आक्रमक, ताफा अडविण्याचा प्रयत्न
हेही वाचा…ठाकरेंच्या ‘या’ चार शिलेदारांकडे पुण्याची जबाबदारी, संपूर्ण शहर पिंजून काढणार
हेही वाचा…“काॅंग्रेसला एकही मत मिळणार नसणाऱ्या बुथ अध्यक्षाला ५१,०० रूपयांचे बक्षीस देऊ”, ‘या’ भाजप नेत्याची घोषणा
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या ९ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, त्याआधी मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
हेही वाचा…“लोकभावनेची झुळूक जर आली तर..,” शरद पवारांच्या ‘या’ पट्टशिष्यांनी अजित पवार गटाला दिला धोक्याचा इशारा