मुंबई : मला घरी एक कार्यक्रम आहे, त्यासाठी मला गेलेच पाहिजे, माझे प्रश्न लवकर घ्या.. असे हातघाईवर येत विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यावर लगेचच शिक्षण मंत्रई दीपक केसरकर यांनी तगादा लगावल्याने विधानपरिषदेत सगळेच आवाक झाले. विधिमंडळाचा काल शेवटचा म्हणजेच सहावा दिवस होता. अधिवेशनाचा शेवटचा दिवस असतानाही कौटुंबीक कार्यक्रम महत्वाचा का? असा सवाल विरोधी पक्षाकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मुुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला घरी कार्यक्रम आहे. माझ्या खात्याचे प्रश्न लवकर घ्या अशी विनंती सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिक्षण विभागाचे प्रश्न होते. त्यात प्रश्नोत्तराच्या तास सुरू होण्यास विलंब झाला आहे. मला घरी एक कार्यक्रम आहेे, माझे प्रश्न लवकर घ्या, माझे आणखी पाच प्रश्न आहेत. मला घरी गेले पाहिजे. त्यामुळे मी विनंती करतो पुढचा प्रश्न घ्या, असं दीपक केसरकर म्हणाले.
आपचे 40 आमदार बैठकीला गैरहजर; महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस
त्यानंतर सभागृहाचे इतर कामकाज सुरू असताना केसरकर यांनी मला घरी लवकर जायचे आहे माझी 93 ची सुचना मला घ्या या विनंतीमुळे सभागृहात कामकाजाबाबत मंत्री गंभीर आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ; जयंत पाटलांची सारवासारव
शिंदे-फडणवीस युती सरकारच्या पहिल्याच विधिमंडळ अधिवेशनात मंत्री सभागृहात नसल्यामुळे अनेकवेळा विरोधाकांनी सरकारला धारेवर धरले आहे. मंत्रीमंडळातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 20 कॅबिनेट मंत्री असून एकही मंत्री राज्यमंत्री नाही. त्यामुळे विधानसभा, विधानपरिषदेतील कामकाजाला सामोरे जाताना मंत्र्यांची चांगलीच तारांबळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
Read also
- गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा
- देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार?
- छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बीडीडी चाळीसंदर्भात एक मोठी घोषणा
- “मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?”