मुंबई : सध्या देशात फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुल केली जाते. टोल नाक्यावरूल वाहतूक वेगाने व्हावी, यासाठी ही फास्टॅग प्रणाली देशात आणण्यात आली होती. मात्र काही टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केली जाते. यामुळे देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ; जयंत पाटलांची सारवासारव
देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार आहेत. त्याऐवजी आता हायटेक पद्धत वापरली जाणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे टोलनाक्यांवरील खोळंबा कायमचा संपेल, असा विश्वास जनतेतुन व्यक्त केला जात आहे. स्वयंचलित पद्धत नेमकी कितपत यशस्वी ठरते, हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
“महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का?”; आमदारांच्या धक्काबुक्कीचा राज ठाकरेंकडून निषेध
देशातील सर्व टोल कधीपर्यंत बंद केले जाणार हे अजून स्पष्ठ झालेले नाही. मात्र त्यासाठी आतापासूनच सुरूवात झाली आहे. सध्या देशात फस्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली केली जात आहे. टोलनाक्यावरील वाहतूक वेगाने व्हावी, यासाठी फास्टॅग प्रणाली आणण्यात आली होती. आता त्याच्या एक पाऊल पुढे जात कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने टोलनाके करण्यात येणार आहेत. स्वयंचलित टोलनाके नेमके कसं काम करणार आहेत हे पाहणं महत्वाचे आहे.
“गद्दार सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काय काय करावे लागते”; आदित्य ठाकरेंचा पलटवार
सोबतच, टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. जे टोल बंद झाले, त्यांनी आशीर्वाद दिले. सत्ता हातात द्या बाकीचे टोलनाके बंद करतो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील 65 ते 67 टोलनाके मनसेने बंद केले आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.
Read also
- छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बीडीडी चाळीसंदर्भात एक मोठी घोषणा
- “मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?”
- मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मुुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
- आपचे 40 आमदार बैठकीला गैरहजर; महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस