पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी अभियान मनसेकडून राबवण्यात येत आहे. पुण्यातील मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाच्या उदघाटनासाठी राज ठाकरे यांनी आज उपस्थिती लावली आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी काल विधानसभेच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भिती; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर
राज्यातील राजकारणात काल विधान भवनाच्या परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोेल मिटकरी यांच्यात चांगलीत धक्काबुक्की झाली. मात्र आपल्याकडे असे कधीच झाले नव्हते. ही युपी-बीहारकडे वाटचाल आहे, असा टोला लगावत या सर्व प्रकाराचा निषेध केला आहे.
“अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा डाग, त्यांनी आम्हाला गाजर दाखवले”
प्रभाग रचना तीन किंवा चारची केल्यास काम करण्यास अडचणी येतात. प्रभागातील सदस्य संख्या वाढवण्याचे काम पहिल्यांदा राष्ट्रवादीने केले. प्रभाग रचना सातत्याने बदलल्याने नगरसेवकांना काम करता येत नाही. अशी खंत व्यक्त केली. एका प्रभागात एका पेक्षा जास्त नगरसेवक कशाला हवेत, असा आक्षेप राज ठाकरे यांनी घेतला आहे.
माझ्याघरी सहा महिन्यापासुन मीटर नाही; आमदारांनी विधानसभेत मांडली व्यथा, फडणवीसांचं उत्तर
राज ठाकरे यांचे आज पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितील त्यांचे स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने मनसे कडून मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक, अशी टॅगलाईन असलेले बॅनर शहर कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. मनसेच्या सदस्य नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Read also
- “गद्दार सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काय काय करावे लागते”; आदित्य ठाकरेंचा पलटवार
- ‘युवराजांची दिशा चुकली’; सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- “त्यामुळेच आपली मान शरमेने खाली जाते”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- औरंगाबादमध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना अटक
- “GST च्या रूपात केंद्र सरकारचा माणुस घरात जेवतोय असं आता लोकांना वाटतंय”; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल