मुंबई : राज्यातील महापालिका फेरबदल विधेयकावरून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. शिंदे- फडणवीस सरकारला निवडणुकींची भिती वाटते. विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मांडायला हवं होतं. असा प्रश्न शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“जे जे हॉस्पिटलमध्ये कुत्रे बसून होते, प्रशासन काय करतंय”; अन् अजित पवार चांगलेच संतापले
सर्वोच्च न्यायालयातमध्ये जी काही सुनावणी झाली. ती सर्वांनी ऐकली आहे. आणि त्यांनी पाच आठवड्यांचा कालावधी दिला आहे. त्यासंदर्भात याठिकाणी देखील चर्चा करून त्यावर योग्य मार्ग काढू शकतो. परंतु आज इतकी घाई का करीत आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच काही लोकांना भिती वाटत आहे की जर उद्या निवडणुका लागल्या तर काय होईल? असा टोला लगावत सर्वोच्च न्यायालयाचा परत परत अपमान का केला जात आहे. ? असा सवाल ही त्यांनी शिंदे सरकारला केला.
“अंबादास दानवे बारामतीचा पोपट, राष्ट्रवादीची तळी उचलुन स्वत:चा पक्ष संपवला”; मनसेचा हल्लाबोल
सरकार घटनाबाह्य बनलं असेल, त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेल. असा टोला शिंदेंना लगावला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी देखील त्य़ांना प्रत्युत्तर दिलं आहे. बहुमताच्या नियमानुसार आमचं काम सुरू आहे. या देशातील संविधान, कायदे आणि नियमाबाहेर आम्ही गेलो नाही, कारण आमच्याकडे भक्कम बहुमताचा आकडा असून ते वाढत चाललं आहे. तसेच आम्ही कोणतीही घटनाबाह्य कृती केली नाही, तीच तर काही लोकांना आवडलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
Read also
- “अमोल मिटकरी महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा डाग, त्यांनी आम्हाला गाजर दाखवले”
- माझ्याघरी सहा महिन्यापासुन मीटर नाही; आमदारांनी विधानसभेत मांडली व्यथा, फडणवीसांचं उत्तर
- विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मोठा राडा; मिटकरींनी सांगितला सगळा घटनाक्रम
- “घरातून बाहेर न पडणारे कसे निवडणुक जिंकणार?”; प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं
- “सरळसेवा भरतीत 2 लाख 193 पदे रिक्त”; शंभुराजे देसाई म्हणाले, “सर्व भरती होणार”