मुंबई : अडीच वर्षे भ्रष्टाचार केला, पंचवीस वर्षात महापालिका लुटली, ज्यांनी फक्त लोणी खायचं काम केलं, त्यांना ओके करण्याचं काम या सरकारने केलं आहे. घरातून न बाहेर पडणारे कसे निवडणुक जिंकणार? असा सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार कायम राहणार, असा विश्वास देखील भाजप आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.
“इडी सरकारने राज्यातील सत्ता ओरबडून घेतलीय, जनता माफ करणार नाही”; सुप्रिया सुळे
खोके विरूद्ध ओकेचा हा सामना होता. ज्यांनी अडीच वर्षे भ्रष्टाचार केला, पंचवीस वर्षात महापालिका लुटली आणि आजही विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून आम्ही साधु संत आहोत असं जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांना आज सत्ताधारी लोकांच्या माध्यमातुन दाखवण्याचा प्रयत्न केला, गेला की सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके.. लव्हासाचे खोके, बारामती ओके..अनिल देशमुखचे खोके, बारामती ओके..नवाब मलीक, दाऊदचे खोके, मातोश्री ओके..या घोषणा देऊन सत्य परिस्थिती दाकवण्याचं काम सत्ताधारी पक्षाने केलं आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.
चुकून पाय लागला तर वाकून नमस्कार करू, परंतु जर..; शिंदे गटाचे आमदार आक्रमक
नारे शोधावे लागत नाहीत. केलेल्या गोष्टी या बाहेर येतच असतात. कितीही घाण समुद्रात टाका ती घान बाहेरच येते तीच बाहेर आलेली घाण आज जनता पाहत आहे. माविआने केलेला भ्रष्टाचार जनता पाहत आहे. मुंबईतील खड्डे, मुंबईतील गटारे, मुंबईतील महापालिकेच्या शाळा, मुंबईतील फुटपाथ या सगळ्यात करोडो रूपयाचा भ्रष्टाचार हा जनतेच्या समोर आम्ही ओके मध्ये आणणार आहे, असंही प्रसाद लाड म्हणाले.
एका व्यक्तीने जाळून घेतले, तर दुसरा थेट मंत्रालयावर आत्महत्येसाठी चढला; विधानसभेत खडाजंगी
विरोधी पक्षाकडे बोलायला आता काहीही राहिलेलं नाही. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितेल की खुप करूणा झाली आता द्या, मया, क्षमा नाही त्यामुळे मला वाटते की, विरोधकांसाठी मुख्यमंत्र्यांनी यावर सुचक वक्तव्य केलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोबत काम केलं आहे त्यामुळे त्याचं सर्व काही माहीत आहे, असंही लाड म्हणाले.
Read also
- “सरळसेवा भरतीत 2 लाख 193 पदे रिक्त”; शंभुराजे देसाई म्हणाले, “सर्व भरती होणार”
- “जे जे हॉस्पिटलमध्ये कुत्रे बसून होते, प्रशासन काय करतंय”; अन् अजित पवार चांगलेच संतापले
- “अंबादास दानवे बारामतीचा पोपट, राष्ट्रवादीची तळी उचलुन स्वत:चा पक्ष संपवला”; मनसेचा हल्लाबोल
- “शिंदे गटातील आमदारांकडून आई-बहिणींवरून शिवीगाळ”; मिटकरींचा गंभीर आरोप
- “आम्ही दिलेल्या घोषणा शिंदे गटाला झोंबल्या”; अजित पवारांचं सत्ताधारी आमदारांना टोमणा