मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा एक धक्कादायक प्रकार दुपारच्या सुमारास घडला. यानंतर आता मंत्रालयात एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले आहे व संबंधित व्यक्ती सुखरूप असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
मंत्र्यालयात कडेकोट बंदोबस्त असताना देखील ही घटना घडली आहे. संबंधीत व्यक्तीला छतावरून खाली उतरवण्यास पोलिसांना यश आले आहे. व्यक्तीला कोणतीही इजा झालेली नाही. असं सांगितलं जात आहे. याबाबत माहिती मिळावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली असता ही घटना मंत्रालयाची असल्यामुळे याच्याशी आपला काहीही संबंध नाही. याची माहिती घेतली आहे. मराठा समाजाच्या मागण्या करत ते वर चढले होते ते आता खाली आणले आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”
सोबतच, दुपारच्या सुमारास सुभाष भानुदास देशमुख वय 45 असणाऱ्या शेतकऱ्याने आज मंत्रालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे. ही व्यक्ती सध्या गंभीररित्या भाजल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
सुभाष भानुदास देशमुख साताऱ्यातील कांदळगावचे रहिवासी आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे देशमुख यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित व्यक्ती मोठ्या प्रमाणात भाजली आहे. भाजल्यामुळे अंगावरचे कातडी वेगळी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
Read also
- “फडणवीसांनीच सांगितलं, की भावना गवळीला पुढच्या निवडणूकीत निवडून आणायचं”; श्रीकांत शिंदे
- “अनिल देशमुखांची काय चुक होती? त्यांनी तर शिक्षणासाठी 100 कोटी घेतले होते”; शरद पवार
- खिशाला परवडणारं पूर्णब्रम्ह, या मेन्यू ला तोड नाही! अमोल कोल्हेंची जागतिक वडापाव दिनी खास पोस्ट
- “नरेंद्र मोदींना बांधलेल्या राखीचा विपरीत अर्थ कोणी काढु नये”
- “सोन्याची अंडी देणारी कोंबडी, शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षांपासून गिळली”