नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केलं. तसेच ज्या ज्याठिकाणी भाजपची सत्ता नाही आहे. त्याठिकाणी भाजप ते नेत्यांना धमकावून, विकत घेऊन स्थापन करीत आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला
आज देशातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. आज भाजप आणि नेत्यांजवळ बहुमत आहे, पण हे उचित बहुमत नाही आहे. देशातील अनेक राज्यांत भाजपची सत्ता नाही. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नव्हती. त्याठिकाणी त्यांनी इडी, सीबीआय यांना सोबत घेऊन सध्या काम केलं जात आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान यांचे भाषण, त्यांनी महिला सन्मानाबाबत वक्तव्य केलं. परंतु 2 दिवसांत गुजरातमध्ये काय झालं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
अनिल देशमुख मेहनत करणारे गृहमंत्री होते. शिक्षणासाठी 100 कोटी घेतले, तरी त्यांच्यावर चार्जशीट दाखल केली. त्यानंतर ती रक्कम 4 कोटी झाली. नंतर 1 कोटी झाली. त्याचबरोबर नवाब मलिक यांची काय चुक होती. ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संजय राऊतांवर देखील भाष्य केलं. 20 वर्षापूर्वी काही व्यवहार झाला होता. संजय राऊत यांना अटक झाली. ते विरोधात लिहीत होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. या पद्धतीने देशात आज कारवाया केल्या जात आहेत. देशात आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- खिशाला परवडणारं पूर्णब्रम्ह, या मेन्यू ला तोड नाही! अमोल कोल्हेंची जागतिक वडापाव दिनी खास पोस्ट
- “नरेंद्र मोदींना बांधलेल्या राखीचा विपरीत अर्थ कोणी काढु नये”
- “सोन्याची अंडी देणारी कोंबडी, शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षांपासून गिळली”
- “दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
- “माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”