मुंबई : अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि लगेच तयार होणारा वडापाव खायला बहुतेक सगळ्यानांच आवडतो. मुंबईचा वडापाव तर जगात फेमस झाला आहे. परदेशातून आलेले नागरिक देखील वडापावचा स्वाद घ्यायला विसरत नाहीत. आज जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जात आहे. याविषयीच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी वडापाव निमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
अमोल कोल्हे यांनी पोस्ट मध्ये असं म्हटलं आहे की, वडापाव अनेक आठवणी, शाळेत हट्टाने खाल्लेला गाडीवरचा वडापाव, मग पुण्यात आल्यावर बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर जोशी वडेवाले. आणि मग स्वप्नांचा पाठलाग करत मुंबईत स्थिरावताना कधी धावपळीतला ब्रंच तर कधी खिशाला परवडणारं पूर्णब्रम्ह. स्थिरावल्यावर डाएट, वजन, पथ्य याकडे पाहून टाळलेला वडापाव कोणेकाळी आधार होता या विचारानं हसू येतं. असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
त्याचसोबतच रिमझिम पाऊस, गरमागरम वडापाव, तळलेली मिरची आणि फर्मास चहा..स्थळ कुठलंही असो .. या मेन्यू ला तोड नाही! असा खसखसीत शब्दाचा देखील त्यांनी खमंग सोडला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकाराचे वडापाव खुप प्रसिद्ध आहेत. जॅम्बो वडापाव, उलटा वडापाव, असे अनेक वडापावचे प्रकार देखील महाराष्ट्रात बघायला मिळतात. परंतु मुंबईतला वडापाव सगळीकडे प्रसिद्ध आहे. यात काही शंका नाही.
View this post on Instagram
Read also
- “नरेंद्र मोदींना बांधलेल्या राखीचा विपरीत अर्थ कोणी काढु नये”
- “सोन्याची अंडी देणारी कोंबडी, शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षांपासून गिळली”
- “दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, आता हे मंगळागौरीला पण देतील”; राज ठाकरेंचा शिदेंना टोमणा
- “माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करतो”
- “माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे विचार आहे”; राज ठाकरेंचा शिंदे- उद्धव ठाकरेंना टोला