मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी युती करत सरकार स्थापन केले. मात्र शिवसेनेने शिंदे गटाविरोधात सर्वोच्च्य न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या. शिवसेनेने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिका आज 5 न्यायाधीश्यांच्या घठनापिठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर होणारी सुनावणी 25 ऑगस्टला होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
“फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली या 3 न्यायाधीश्यांच्या खंडपीठासमोर राज्याच्या संत्तासंघर्षाची आज सुनावणी होती. ही सुनावणी आता 5 न्यायाधीश्यांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापन करण्यासाठी दिलेल निमंत्रण, विधिमंडळात शिंदे सरकारने सिद्ध केलेले बहुमत, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, शिवसेनेच्या चिन्हावर दावा कोणाचा अशा याचिकांवर सुनावणी होणार आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली याचिका, अपात्रतेच्या याचिकेविरोधात शिंदे गटानेही दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची निवडीविरोधातही शिवसेनेने याचिका दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
“राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवण्यात आले व गोगावले यांचे मुख्यप्रतोदे पद रद्द करण्यासंदर्भात शिंदे गटाने याचिका दाखल केली या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रिम कोर्ट 5 न्यायाधीश्यांच्या घठनापिठाकडे वर्ग केले आहे. यामुळे 25 ऑगस्टला या याचिकांवर सुनावणी होणार आहे या सुनवणीवर संपुर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
Read also
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल