मुंबई : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील महिला अत्याचार प्रकरण हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असताना शक्ती कायद्याचा अभ्यास झाला. त्यासाठी समिती गठीत केली गेली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या काळात दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाले. मात्र या विधेयकाचे पुढे काय झाले याचे उत्तर सरकारकडून मिळाले पाहीजे. आपण ‘हर घर तिरंगा’ म्हणत असलो तरी यासोबतच ‘हर घर’ महिलांना न्याय देखील मिळाला पाहीजे. आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत, अशी भूमिका आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत मांडली.
“राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
सध्या देशात बिलकिस बानो प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील ११ आरोपींची सुटका करण्यात आली असून त्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर बिलकिस बानो यांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. समाजाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढला पाहीजे. याकरता शक्ती कायदा मंजूर होणे आवश्यक आहे. यावर फक्त चर्चा करुन चालणार नाही, तर प्रत्यक्षात काम केले पाहीजे, असं मिटकरी म्हणाले.
“त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर तीन आरोपींनी अत्याचार केले. शाहूपुरी येथे २३ वर्षीय तरुणीवर लिंबू फिरवून तिच्यावर अत्याचार केले गेले. त्यानंतर जादूटोणा प्रतिबंधित कायद्यांतर्गत आरोपींवर कारवाई देखील झाली. ज्या विषयासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी आपले बलिदान दिले, त्या अंधश्रद्धेचा धागा पकडून महिलेवर अत्याचार होत असतील तर ही महाराष्ट्राला अशोभनीय बाब आहे, असही अमोल मिटकरी म्हणाले.
“केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
गोंदिया-भंडारा प्रकरणानंतरही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले. भारतात दर १७ मिनिटाला एक महिला अत्याचारला बळी पडते. महिला जेव्हा पोलिसांकडे न्याय मागायला जाते, तेव्हा पीडित महिलेलाच प्रश्न विचारून, भांडावून सोडण्यात येते. कायद्यासमोर सर्व समान आहेत, असे भाषण आपण करतो. पण आपल्या देशातील असमानतेबाबत नव्याने भाष्य करण्याची गरज आहे. या प्रकरणानंतर ही असमानता लक्षात आली आहे, असही मिटकरी म्हणाले.
Read also
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- “फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
- हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड