मुंबई : राज्य सरकारने मांडलेल्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या विधेयकाद्वारे आपण एकाधिकारशाहीकडे व्यवस्था घेऊन जात असल्याची शंका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत उपस्थित केली. या विधेयकातून आपण प्रशासनाला बळकटी देऊन निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष निवडणुकीचे विधेयक आणत असताना सत्तेचे विकेंद्रीकरण करायला हवे होते. मात्र तुम्ही लोकशाहीची मुख्य मूल्ये विकलांग करत आहात. तसेच एकाधिकारशाही वाढवून अधिकाऱ्यांना ताकद देत आहात. आपल्या सभागृहात २८८ सदस्यांमधून आपण बहुमताने नेता निवडतो. ते जर आपण इथे करू शकतो तर इतर स्तरावर का नाही करायचे, असे ते म्हणाले.
तुम्हाला संविधानाचे रक्षण करण्यासाठी इथे आणले आहे. सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्राथमिक उद्देशाचाच या विधेयकामुळे पराभव होतोय. त्यामुळे तुम्ही हे विधेयक अमान्य करणार नसाल तर किमान यात रचनात्मक बदल करावे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक घेण्यासंबंधीचे विधेयक आज मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी सभागृहात मांडले. महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे यासाठी वकिली केली होती. एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
तसेच या प्रक्रियेत मनी आणि मसल पॉवर असणारी विकृती वाढीस लागेल. यापूर्वीही अनेक वेळा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून देण्याचे निर्णय घेण्यात आले होते, काही काळासाठी ते राबविले सुद्धा होते. मात्र अनेक ठिकाणी थेट जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष एका विचाराचा आणि सभागृहात सदस्यांचे बहुमत दुसऱ्या विचाराचे असे प्रकार झाले होते. त्यामुळे शहराच्या विकासकामात आणि निर्णय प्रक्रियेत एकमत होत नाही. त्याचा परिणाम संबंधित शहराच्या विकासावर होतो. त्यामुळे कोणत्याही विषयीचा भावनिक निर्णय न घेता, तो पूर्णपणे व्यवहारी पातळीवर पडताळून घेणे आवश्यक असते. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय म्हणजे लोकशाहीला अत्यंत घातक आहे असे सांगत अजित पवार यांच्याकडून या निर्णयाला कडाडून विरोध केला.
Read also
- “फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
- हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
- “राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- “त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
- “केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल