मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्ररचना जैसे थे ठेवा, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारने मुंबई पालिकेत 236 वॉर्ड केले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी संख्या कमी करून 227 वॉर्ड केले होते. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आला आहे.
मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार; ट्विट करत दिली माहिती
राज्यातील 93 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीबाबत जो काही निर्णय दिला आहे. तो निकाल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना कोणताही धक्का बसला नाही. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की, मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा असा आदेश दिला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे ओबीसी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच या सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणासोबतच होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
“विनायक मेटेंना तात्काळ उपचार का मिळाला नाही”; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय न्याय देणारा आहे. महिना दीड महिन्यापुर्वी ज्या नगरविकास मंत्र्यांनी वॉर्ड पुनर्रचनेच्या आदेशावर सही केली. तेच आजही नगरविकास मंत्री आहेत. मग या काळात असं काय बदललं. त्यानीचनंतर विरोध केला. न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला आहे. अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे आमदार आंबादास दानवे यांनी दिली आहे.
“शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरून 236 वर नेली होती. महाविकास आघाडी सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने हे वॉर्ड रद्द करण्यात आल्याची माहिती देत शिंदे सरकारनं निर्णयय घेतला होती. त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करून ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती. त्याप्रमाणे होती. या निर्णयाला शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान्, आज सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंद आणि उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकांसंदर्भात सुनावणी होण्याची शक्यात आहे. या दोन्ही बाजून तब्बल पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत आहे. त्यावर आज निर्णय होणार का ? की यावर आता सर्वोच्च न्यायालाय घटनापीठ बसवण्याचा निर्णय घेणार ? त्याकडे देखील लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- ” सत्तेच्या बाहेर भाजपवाले माश्यासारखे, जाधव काव-काव काय करताय”; शंभुराजे देसाई अन् भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी
- “यामुळे मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
- “डासांचे वर्गीकरणात किती नर अन् किती मादी डास आढळले?”; भुजबळांनी आरोग्य मंत्र्यांची घेतली फिरकी
- “700 वर्षापुर्वीच्या राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मुर्त्या चोरीला”; विधानसभेत चर्चा
- “मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”