मुंबई : बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीची केस स्टडी सध्या अभ्यास करत आहे. त्या केस स्टडी संदर्भात संपूर्ण माहिती लवकरच बाहेर घेऊन येणार आहे, असा इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांनी रोहित पवार यांना दिला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी कंबोज यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मोहित कंबोज खाऊन खाऊन फुगलेत असा टोला देखील अमोल मिटकरी यांनी मोहित कंबोज यांना लगावला आहे.
“गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
अभ्यास करायला मेंदु तेवढा असला पाहिजे. हा माणुस कोणाच्या इशाऱ्यावर चालतो, त्यांच्या मागे कोणाचा मेंदु आहे. त्यांनी बारामतीत जावं अजुन अभ्यास करावा. तिथे झालेला विकास बघावा आणि वेळ मिळाल्यास नाक घासावं अन जर थोडा मेंदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा. कंबोज नावाच्या भोंग्याला जास्त महत्व द्यावे असं मला वाटत नाही, असा टोला मिटकरी यांनी कंबोज यांना लगावला आहे.
“आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे
काजु, बदाम आणि खारखा खाऊन लठ्ठ झालेला आहे. त्यांनी ट्विट करण्यापेक्षा अजित पवारांसारखं कुपोषित बालकांच्या गावात दौरा करावा म्हणजे ते कमी होतील. आम्ही ठरवले आहे की असल्या ट्विटला प्रतिक्रिया द्यायची नाही, यामागे खरे कलाकार कोण आहेत हे सगळ्यांना माहित आहे, असही मिटकरी म्हणाले.
“शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार नावाचे दिव्यपुरूष कृषीमंत्री भेटले आहेत. नगर जिल्ह्याचा दौरा त्यांनी रात्री 1 वाजता केला. शेतीमध्ये पाणी आहे, अंधार आहे अश्या वेळेत ते दौरे करणाऱ्या महाराष्ट्राच्या दिव्यपुरूषापैकी एक आहेत, असा टोला मिटकरी यांनी कृषी मंत्री सत्तार यांना लगावला आहे. महाराष्ट्र सरकारने जर ओला दुष्काळ जर घोषित नाही केला तर यांना खुर्च्या खाली कराव्या लागतील असा इशारा देखील मिटकरी यांनी शिंदे सरकारला दिला आहे.
Read also
- मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार; ट्विट करत दिली माहिती
- “विनायक मेटेंना तात्काळ उपचार का मिळाला नाही”; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
- “शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा
- फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली
- “गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”