मुंबई : आमदार विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी निवेदन केलं. विनायक मेटे यांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला. याचीही चौकशी करणार असल्याचं म्हणाले. या सोबतच विनायक मेटे यांच्या वाहनाचा अपघात कसा झाला यांचीही माहिती त्यांनी दिेली.
“शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
विनाय मेटे यांच्या गाडीच्या ड्रायवरने गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला ते अतिशय चुकीचं जेजमेंट होते. त्यामुळे ज्या बाजुला विनायक मेटे बसले होते, त्या बाजुला जबर धक्का बसला त्यामुळे जागीच त्यांचा मृत्यु झाला असं डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र गंभीर स्थिती ही आहे की त्यांच्या ड्रायवरने 112 नंबर वर कॉल केला. नवी मुंबई पोलिसांनी तो फोन उचलला व ते ड्रायवरने सांगितलेल्या लोकेशनवर लगेच निघाले. मात्र ड्रायवरने सांगितलेल्या लोकेशनवर त्यांना कोणीही दिसले नाही. ते त्याच्याही पुढे गेले तरी देखील त्यांना त्या ठिकाणी कोणी दिसले नाही. मुंबई पोलिसांकडून रायगड पोलिसांना अलर्ट करण्यात आलं. रायगड पोलिस त्या ठिकाणी पोहचले. त्या ठिकाणी आयआरबी पोहोचली व त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आंल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
“गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
यासोबतच, आपल्याला आपल्या सिस्टिम बदलाव्या लागतील. 112 ला फोन गेल्यानंतर त्यांना त्याचं थेट लोकेशन गेले पाहिजे हेच अपेक्षित आहे. जर मेटे यांच्या ड्रायवरने चुकीचा पत्ता सांगितला असता तरी त्यांचं बरोबर लोकेशन आलं असतं तर त्यांना तात्काळ मदत मिळाली असती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ
लोकेशनच्या आधारावरच पोलिसांना लवकर त्या जागी पोहोचता येईल व मदत लवकर मिळेल, महामार्गावर ट्रेलर जर आपली लेंथ सोडुन जात असेल तर त्याची ही माहिती आपल्याला मिळेल जर अशी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार आहे जर एकादा अपघात झाला तर त्याचे तात्काळ लेकेशन हे मिळेल अशी यंत्रणा आपण महामार्गावर लावणार आहेत जेणेकरून अशी घटना पुन्हा होऊ नये, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Read also
- “शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा
- फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली
- “गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”
- “गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
- “आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे