जालना : आज विधानपरिषदमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी त्यांच्या मतदारसंघातील मूर्तिचोरीची घटना मांडली. जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जाम समर्थ गावातील मंदिरांमधील सातेश वर्षापूर्वीच्या राम, लक्ष्मण, हुनमानाच्या मूर्ती काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या आहेत. या घटनेमुळे जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. अशी माहिती राजेश टोपे यांनी सभागृहात आज दिली.
“गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार”
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मुळ जन्मगाव असलेल्या जांब समर्थ इथल्या ऐतिहासिक मूर्त्या अलिकडेच चोरीला गेल्या. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील या ऐतिहासिक आणि दुर्मिळ पंचधांतूच्या मुर्त्या चोरी केल्या आहे. समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या राम लक्ष्मण सीतेची मुर्त्याही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन देखील चोरीला गेले आहे.
“गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
पोलिसांनी रात्री तीन वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चोरांनी पाळत ठेऊन मुर्त्या चोरी केल्याची प्रार्थमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. आमदार राजेश टोपे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे विधानसभेत त्यांच्या मतदारसंघातील मूर्तिचोरीची घटना मांडली. जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जाम समर्थ गावातील मंदिरांमधील सातशे वर्षांपूर्वीच्या राम, लक्ष्मण, हनुमानाच्या मूर्ती काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या आहेत. या घटनेमुळे जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यभरातून लोक याठिकाणी दर्शनाला येतात. त्यामुळे याप्रकरणाची गृह विभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना तात्काळ अटक करून सर्व मूर्ती परत कशा मिळवता येतील याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली.
Read also
- “मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”
- मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार; ट्विट करत दिली माहिती
- “विनायक मेटेंना तात्काळ उपचार का मिळाला नाही”; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
- “शिंदे गट फिंदे गट काही नाही, आम्हीच खरी शिवसेना”; संतोष बंगार यांचा शिवसेनेवर दावा
- फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी अन् कबुली