सोलापुर : राज्याचे माजी मंत्री व भाजपचे आमदार हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याची तोडफोड करण्यात आली आहे. सोलापुर जिल्ह्यातील इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून उसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. एफआरपी द्या अन्यथा कारखान्याला टाळे ठोकणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी एफआरपीची रक्कम मिळावी म्हणुन ठिय्या आदोलन केले होते. मात्र पाच महिन्यापासुन एफआरपीची रक्कम न दिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाची आज तोडफोड केली आहे. हा साखर कारखाना बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे या गावाच्या हद्दीत भाजपचे आमदार हर्षवर्धन पाटील यांचा इंद्रेश्वर साखर कारखाना आहे. या कारखान्याने गाळप केलेल्या उसाची एपआरपी पाच महिने उलटूनहा अद्याप देण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या संयमाचा कडेलोट झाला. त्यातून ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.
“डासांचे वर्गीकरणात किती नर अन् किती मादी डास आढळले?”; भुजबळांनी आरोग्य मंत्र्यांची घेतली फिरकी
उसाची एफआरपी मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली उपळाई ठोंगे या गावात इंद्रेश्वर साखर कारखान्याला टोळे ठोकण्यासाठी शेतकरी गेटवर आंदोलन करत होते. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या त्यातील एका संतप्त शेतकऱ्याने थेट इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे.
Read also
- “राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- “त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
- “केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला कुठेही धक्का लागलेला नाही;” न्यायालयाच्या त्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- ” सत्तेच्या बाहेर भाजपवाले माश्यासारखे, जाधव काव-काव काय करताय”; शंभुराजे देसाई अन् भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी