जालना : आज विधानपरिषदमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री राजेश टापे यांनी त्यांच्या मतदारसंघातील मूर्तिचोरीची घटना मांडली. जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जाम समर्थ गावातील मंदिरांमधील सातेश वर्षापूर्वीच्या राम, लक्ष्मण, हुनमानाच्या मूर्ती काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या आहेत. या घटनेमुळे जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. अशी माहिती राजेश टोपे यांनी सभागृहात आज दिली. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“700 वर्षापुर्वीच्या राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मुर्त्या चोरीला”; विधानसभेत चर्चा
जाम समर्थ येथून अत्यंत पुरातन असे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान आणि अन्य दोन मुर्त्या चोरीला गेल्या आहेत. असा ऐतिहासिक ठेवा गायब होणे चिंताजनक आहे. आज देव सुरक्षित नाहीत. चोर तात्काळ पकडून मुर्त्या पुनर्स्थापित कराव्यात असे आवाहन आंबादास दानवे यांनी राज्य सरकारला केले आहे.
“मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मुळ जन्मगाव असलेल्या जांब समर्थ इथल्या ऐतिहासिक मूर्त्या अलिकडेच चोरीला गेल्या. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील या ऐतिहासिक आणि दुर्मिळ पंचधांतूच्या मुर्त्या चोरी केल्या आहे. समर्थ रामदासांनी स्थापित केलेल्या राम लक्ष्मण सीतेची मुर्त्याही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन देखील चोरीला गेले आहे.
मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार; ट्विट करत दिली माहिती
पोलिसांनी रात्री तीन वाजताच्या सुमारास ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. चोरांनी पाळत ठेऊन मुर्त्या चोरी केल्याची प्रार्थमिक माहिती मिळत आहे. याप्रकरणाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. आमदार राजेश टोपे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे विधानसभेत त्यांच्या मतदारसंघातील मूर्तिचोरीची घटना मांडली. जालना जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामींचे जन्मगाव असलेल्या जाम समर्थ गावातील मंदिरांमधील सातशे वर्षांपूर्वीच्या राम, लक्ष्मण, हनुमानाच्या मूर्ती काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या आहेत. या घटनेमुळे जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यभरातून लोक याठिकाणी दर्शनाला येतात. त्यामुळे याप्रकरणाची गृह विभागाने गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना तात्काळ अटक करून सर्व मूर्ती परत कशा मिळवता येतील याचे आदेश दिले असल्याची माहिती दिली.
Read also
- “केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला कुठेही धक्का लागलेला नाही;” न्यायालयाच्या त्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- ” सत्तेच्या बाहेर भाजपवाले माश्यासारखे, जाधव काव-काव काय करताय”; शंभुराजे देसाई अन् भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी
- “यामुळे मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
- “डासांचे वर्गीकरणात किती नर अन् किती मादी डास आढळले?”; भुजबळांनी आरोग्य मंत्र्यांची घेतली फिरकी