मुंबई : बीड, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबिन पिकांचे गोगल गायिनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तीन-चार वेळा पेरणी करूनही शेतकऱ्यांना पीक हाती लागले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यासोबतच अनेक महत्वाच्या मागण्या आज राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत मांडल्या.
“मोहित कंबोजने नाक घासावं अन् मेदु शिल्लक असेल तर आपल्या भागाचा विकास करावा”
महाराष्ट्रातल्या 40 लाख सर्वसामान्य गोरगरीब, निराधार, सामान्य, ज्येष्ठ नागरिक यांच्या संबंधित आहे. या विभागाची जबाबदारी मी मागील अडीच वर्षात पाहिली आहे. एक नक्कीच आहे की 12 हजाराची अट काढण्या संदर्भात सरकारची नेमकी भुमिका काय आहे. वित्त मंत्री यांनी सांगितले की आम्ही वित्त विभागाकडे पाठवु असे म्हणाले. याचे उत्तर मिळावे. 21 हजाराची जी अट आहे, ती दर वर्षी बदलावी लागते. सरकार हे करणार का असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर आता रोहित पवार; ट्विट करत दिली माहिती
केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला आहे. त्यांमुळे त्या निराधाराचं, सामान्य मानसाचं एका हजारात भागेल असं वाटत नाही. म्हणुन याच्यात वाढ करणं गरजेचं आहे. राज्य सरकार यात वाढ करणार का? आणि 1 एप्रिल पासुन या योजनांसाठी केंद्र सरकारकडून किती निधी आला आहे. याची माहिती साधर करावी, असं धनंजय मुंडे म्हणाले.
“विनायक मेटेंना तात्काळ उपचार का मिळाला नाही”; फडणवीसांनी सांगितलं खरं कारण
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे 4 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायीनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यांवर मीठ टाकून त्यांना नष्ट करत. मात्र, पुन्हा पेरणी केली तरी तीच परिस्थितू उद्भवत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी पाठपुरवा केला.
Read also
- “शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला कुठेही धक्का लागलेला नाही;” न्यायालयाच्या त्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- ” सत्तेच्या बाहेर भाजपवाले माश्यासारखे, जाधव काव-काव काय करताय”; शंभुराजे देसाई अन् भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी
- “यामुळे मनी, मसल पॉवर असणाऱ्यांचे वर्चस्व निर्माण होऊ शकते”; अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले खडेबोल
- “डासांचे वर्गीकरणात किती नर अन् किती मादी डास आढळले?”; भुजबळांनी आरोग्य मंत्र्यांची घेतली फिरकी
- “700 वर्षापुर्वीच्या राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या मुर्त्या चोरीला”; विधानसभेत चर्चा