मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, गद्दारांची भाकरी, भाजपची चाकरी, अशी घोषणाबाजी करताना पाहायला मिळाली. यासोबतच सभागृहात ही सत्ताधारी आणि विरोधीपक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकनाथच राहावे ऐकनाथ होऊ नये. ऐकनाथ झाल्यामुळे घेतलेले निर्णय स्वत:लाच बदलावे लागतात असं म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांना दिवसात तारे दाखवले.
परवा धनंजय मुंडे मोठ्या-मोठ्याने ओरडत होते. चलो गुवाहाटी..चलो गुवाहाटी.. अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत होते. जणू काही ते खूप वर्षापासूनचे शिवसैनिक आहेत. आता त्यांच्याबद्दल काय बोलावं. तुमचा सगळा प्रवास मला माहिती आहे. आम्हाला सगळं माहितीय. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, द्या, करूणा दाखवली. पण परत परत ती दाखवता येणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंडे यांना लगावला आहे. यानंतर सभागृहात मोठा हशा पिकला.
पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी…अशी जोरदार घोषणाबाजी राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर केली. ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, पन्नास खोके, माजलेत बोके, पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं आहे.
“डासांचे वर्गीकरणात किती नर अन् किती मादी डास आढळले?”; भुजबळांनी आरोग्य मंत्र्यांची घेतली फिरकी
यासोबतच, देवेंद्र और मैं है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ, असं म्हणत मी जर सक्षम नसतो, तर एवढा कार्यक्रम केला असता का? असे सुचक विधान मुख्यमंत्रई एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मागील सरकार अल्पमतात आल्यानंतर राज्यपालांना पत्र दिले होते. मग सरकार अल्पमतात आले तरी 400 परिपत्रकं का काढली आहेत. मग ते निर्णय रद्द कसे करणार नाही, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला आहे.
Read also
- हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
- “राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- “त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
- “केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला कुठेही धक्का लागलेला नाही;” न्यायालयाच्या त्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया