मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठा चतुराईने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. त्याआधी भाजप नेते महाविकास आघाडीवर सातत्याने टिका करताना दिसले. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेते शांत झाले. यावरून राष्ट्रवादीने त्यांच्यावर टिका केली आहे.
“केंद्र सरकारने जीएसटी आता राशनवर देखील लावला” धनंजय मुंडेंचा केंद्रावर हल्लाबोल
महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते गोपीचंद पडळकर, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, रयतक्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, सातत्याने टिका करीत होते. महाविकास आघाडीवर ते विविध मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातच अभिनेत्री कंगणा रणावत ही देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत होती. पंरतु आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करीत सरकार स्थापन केल्यानंतर ते नेते शांत बसले आहेत.
राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, राज्यात ईडी सरकार आल्यापासून गोपीचंद पडळकर,सदावर्ते, नवनीत राणा, सदाभाऊ खोत, किरीट सोमय्या, कंगना “बेरोजगार” झाल्यासारखे वाटतात. असं म्हणत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या देखील महाविकास आघाडीतील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते.
Read also
- “निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- “फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
- हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
- “राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
- “त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान