पुणे : मुंबईमध्ये दहीहंडीच्या उत्सवात गोविंदानी अफझल खानाचा वध हा देखावा सादर केला होता. मात्र येत्या गणेशोत्सवात मध्ये पुण्यात या देखाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आङे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कोथरूड गावठाण येथील संगम तरूण मंडळ ट्रस्टच्या वतीने अफझल खानाचा वध सादर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशन येथून ती परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यावर आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. तसेच शिवसेनेने देखील यावर टिका केली आहे.
हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांकडून तोडफोड
शहरात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून परवानगी नाकारल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यावर मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करीत असे म्हटले आहे की, अफजल खानाच्या वधाचा जिवंत दाखवण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. अफजल खानाबद्दल कोणाला प्रेम आहे आणि ते जर असेल तर अशा औलादी महाराष्ट्रात पोसता कामा नयेत. हे सरकार हिंदुत्वाच नाव घेऊन सत्तेत आलं आहे. याचा विसर पडता कामा नये. पोलिसांनी असे तुघलकी निर्णय घेऊ नयेत. असंही ते म्हणाले.
“राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणुन पाहा”; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
शिवसेनेचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी असं म्हटलं आहे की, हे शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते. पुण्यात अफझलखान वधाच्या देखाव्याला परवानगी नाकारणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपासून दूर करणे आहे. हे कसले हिंदुत्व आहे, मग तुमचे. ही परवानगी नाकारता कामा नये असंही त्यांनी म्हटलं आहे.
“त्यामुळेच आज देव सुरक्षित नाहीत; आंबादास दानवेंचं सरकारला आवाहान
दरम्यान, दहीहंडी कार्यक्रमात एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. त्यावर बोलताना आंबादास दानवे म्हणाले की, दहीहंडी दरम्यान संदेश दळवी नामक एका तरुण मुलाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. भाजप-शिंदे सरकारने एका तरुणाच्या आयुष्याची किंमत ही पैशांमध्ये मोजून आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे.
Read also
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”
- “इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- “फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे