दिल्ली : महाराष्ट्राच्या ऑपरेशन लोटस नंतर आता दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू असल्याची चर्चा होत आहे. याचर्चेला पुर्णविराम देण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती मात्र या बैठकीला आपचे सुमारे 40 आमदार गैरहजर असल्याने राजधानीत राजकीय भुकंप होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
औरंगाबादमध्ये काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नगरसेवकांना जुगार खेळताना अटक
आपचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आसल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या आमदारांची आपल्या निवासस्थानी आज बैठक बोलावली होती. या बैठकीला आपच्या 40 आमदारांनी गैरहजेरी लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांचा अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकलेला नसल्याचं स्पष्ठ झालेलं आहे. दिल्लीच्या राजकारणात आता काय राजकीय भुकंप होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.
दिल्लीत एकुण 70 आमदार आहेत. त्यातील आपचे 62 तर भाजपचे 8 आमदार असा आकडा आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 36 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे भाजपने आपचे आमदार फोडले असल्याचा आरोप आपच्या नेत्याकडून केला जात आहे. भाजपने आपच्या आमदारांना आप सोडण्यास 20 कोटी आणि इतर आमदाराल सोबत आणले तर 25 कोटींची ऑफर दिली आहे असा आरोप केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी आपचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं आपचे नेते संजय सिंह व सोमनाथ भारती यांनी सांगितले आहे.
सत्ताधाऱ्यांना निवडणुकीची भिती; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदेंचं प्रत्युत्तर
काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता. 14 तास त्यांची सीबीआयकडून करण्यात आली होती. त्यानंतर भाजप त्यांना आप सोडण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर देत असल्याचं सिसोदिया यांनी म्हटले होते. त्यामुळे या सर्व प्रकारात भाजपचा हात असल्याचा आरोप आपच्या नेत्याकडून केला जात आहे.
Read also
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ; जयंत पाटलांची सारवासारव
- “महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का?”; आमदारांच्या धक्काबुक्कीचा राज ठाकरेंकडून निषेध
- “गद्दार सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काय काय करावे लागते”; आदित्य ठाकरेंचा पलटवार
- ‘युवराजांची दिशा चुकली’; सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- “त्यामुळेच आपली मान शरमेने खाली जाते”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत