मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्यास असणाऱ्या पोलिसांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. पोलिसांना नाममात्र दरात येथे घरं देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात थेट किंमतच 15 लाखात पोलिसांना मिळणार आहे अशी घोषणा केली आहे.
“गद्दार सरकारमध्ये मंत्रिपदासाठी काय काय करावे लागते”; आदित्य ठाकरेंचा पलटवार
बीडीडी चाळीत पोलिसांना 15 लाखांमध्ये मालकीचा हक्काची सदनिका देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना केली. यापुर्वी 50 लाख आणि 25 लाख ठेवण्यात आली होती. त्यामुळे ही एक महत्वाची व मोठी गोष्ट आहे.
‘युवराजांची दिशा चुकली’; सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कार्यालयात बीडीडी चाळ प्रकरण काही महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यात आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का हे पाहणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये 500 चौरस फुटांची घरं मोफत देणार असल्याचं सांगितले आहे.
“त्यामुळेच आपली मान शरमेने खाली जाते”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
यासोबतच, औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विधानसभेत नामांतराचे प्रस्ताव एकमुखाने मंजूर करण्यात आले आहे. औरंगाबादचे आता छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले जाणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचे नाव देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडे यासंबंघी तिन्ही प्रस्ताव सादर केले जाणार आहेत.
Read also
- “मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?”
- मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मुुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
- आपचे 40 आमदार बैठकीला गैरहजर; महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ; जयंत पाटलांची सारवासारव
- “महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का?”; आमदारांच्या धक्काबुक्कीचा राज ठाकरेंकडून निषेध