दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे महत्वाचे नेते समजले जात होते. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आपचे 40 आमदार बैठकीला गैरहजर; महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस
अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील दरबारी राजकारण करणाऱ्यांनी देशासाठी ज्या योग्य गोष्टी आहेत त्यासाठी लढा देणायाची इच्छा आणि क्षमता गमावली आहे. भारत जोडो यात्रा सुरू करण्याऐवजी नेतृत्वाने काँग्रेस जोडो यात्रा सुरू करण्याची गरज होता. या सगळ्यामुळे दु:खी मनाने मी काँग्रेससोबत असलेले माझे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मी काँग्रेस पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा देत आहे, असं आझाद यांंनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सभागृहात गदारोळ; जयंत पाटलांची सारवासारव
गेल्या कीही दिवसांपासून गुलाम नबी आझाद अस्वस्थ होते. पक्षाच्या बैठकीतुन, त्यांच्या विधानावरून आणि कृतीतुन ही अस्वस्थता दिसत होती. या आधीच जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती मात्र नियुक्तीनंतर काही तासातच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची नाराजी उघडकीस आली होती.
“महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचा आहे का?”; आमदारांच्या धक्काबुक्कीचा राज ठाकरेंकडून निषेध
काँग्रेसच्या कार्यपद्धतीबद्दल आपला आक्षेप नोंदवला होता. सोनिया गांधीना त्यांनी याबद्दल पत्रही लिहलं होतं. जी-23 नेत्यांचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. शिवाय या गटावर काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेमुळे ते अस्वस्थ होते. आनंद शर्मा यांनीही दोन दिवसांपुर्वी जबाबदाऱ्यांचा त्याग केला होता.
Read also
- देशातील सर्व टोलनाके बंद करण्यात येणार?
- छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बीडीडी चाळीसंदर्भात एक मोठी घोषणा
- “मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण तुम्हाला साधं विरोधी पक्षनेता तरी होता आलं का?”
- मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी मुुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी