औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबादचा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काल शनिवारी आणि रविवारी एकनाथ शिंदे यांनी रात्री दहानंतर औरंगाबाद शहरात स्पीकरवरून भाषण केलीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आनंद कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तींनी एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“भाजप अध्यक्षांची वक्तव्ये ही देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्याची घोषणाच”
एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सुरूवातीला त्यांनी नाशिक, मालेगाव येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर ते शनिवारी आणि रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती. या दौऱ्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रात्री 10 नंतर लाऊड स्पीकरवरून भाषण केल्याचा आरोप करत आनंद कस्तुरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. चिकलठाणा येथील आनंद कस्तरे हा रहिवासी आहे.
संजय राऊत यांना हृदयविकरचा त्रास; तुरूंगात घरचे जेवण, औषध देण्यास परवानगी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाऊड स्पीकरद्वारे भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लघंन केलं आहे. तसेच त्या ठिकाणी बेकायदेशीर जमावसुद्धा उपस्थित होता. असं आनंद कस्तुरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. आनंद कस्तुरे हा आंबेडकरी चळवळीत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांनी 31 जुलै रोजी क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी; सामानाचा आवाज ४ दिवस जेलबंद
दरम्यान, आज एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. हडपसर येथील उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात नियोजन होतं. मात्र काही स्वंयसेवी संघटनांनी याला आक्षेप घेतला. हडपसर येथील उद्यानाची जागा महापालिकेची आहे. मात्र उद्यानाचा विकास आपण केल्याचा दावा नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी केला आहे. त्याप्रमाणे परिसरातील रहिवासी आणि महापालिक आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदें यांचं नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती. असा दावा देखील त्यांनी केला. तसेच याच कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार आहेत.
Read also
- “दत्त अन् दत्ताची गाय सोडून सरकारने सगळ्याच गोष्टीवर जीएसटी लावला”; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल
- “मुंबईचा पैसा, मुंबईच वैभव तुम्हाला गिळायचं “? उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
- “लोकशाहीचा विरोध करताना हुकुमशाहीची भलामण संघाने केली”; काॅंग्रेसची भाजपवर जोरदार टिका
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”
- “भाजपच्या बारा पिढ्या जरी खाली उतरल्या, तरी शिवसेना कधीच संपणार नाही”